शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
4
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
5
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
6
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
7
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
8
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
9
भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
10
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
11
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
12
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
13
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
14
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
15
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
16
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
17
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
18
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
19
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
20
२७ जागांवर वंचित कुणाचा करणार 'गेम', महापालिका निवडणुकीत ५३ उमेदवार उतरवले रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा कल खासगी शिक्षण संस्थाकडे

By admin | Updated: May 13, 2014 19:16 IST

ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक गावात जि.प. च्या उर्दू आणि मराठी शाळांत विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध क रू न दिल्या; परंतु शासनाने उपलब्ध करून दिलेल्या योजनांची नीट अंमलबजावणीच होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांचा दर्जा खालावत असून, भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांचा कल खासगी शिक्षण संस्थांकडे वळत आहे.

बाभुळगाव जहागीर: ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक गावात जि.प. च्या उर्दू आणि मराठी शाळांत विद्यार्थ्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध क रू न दिल्या; परंतु शासनाने उपलब्ध करून दिलेल्या योजनांची नीट अंमलबजावणीच होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांचा दर्जा खालावत असून, भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांचा कल खासगी शिक्षण संस्थांकडे वळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा उंचावा, शिक्षणाची गंगा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचावी, असा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शासनाने सर्वशिक्षा अभियान योजना अस्तित्वात आणली. कोट्यवधी रुपये खर्च करून प्रत्येक गावातील जि.प. मराठी आणि उर्दू शाळांसाठी सुसज्ज अशा इमारती बांधल्या. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पोषण आहार, गणवेश, पुस्तके, दप्तर आदी सुविधाही पुरविल्या, तसेच प्रत्येक शाळेत संगणक आणि प्रयोगशाळेची सुविधाही उपलब्ध करून दिली. महत्त्वाचे म्हणजे शाळेतील सर्व शिक्षकांना मुख्यालयी राहणे आवश्यक केले. या सर्व सोयी-सुविधांमुळे ग्रामीण भागांसह शहरात असलेल्या शासकीय शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल, हा शासनाचा विचार फोल ठरला कारण या सोयी-सुविधांची नीट अंमलबजावणीच केल्या जात नसून, कित्येक शाळांतील शिक्षक मुख्यालयीसुद्धा राहत नाहीत. कित्येक ठिकाणी संगणक असूनही विद्यार्थ्यांना त्या संदर्भातील ज्ञान दिले जात नाही. अनेक ठिकाणच्या शाळांत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळत नाही, तर अनेक ठिकाणी तो काळजीपूर्वक तयार केला जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. शाळा प्रशासनाचे उदासीन धोरण आणि शिक्षकांच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा दिवसंेदिवस खालावत चालला. परिणामी पाल्याच्या भविष्याचा विचार करून पालकवर्गाचा कल खासगी शिक्षण संस्थाकडे वळू लागला आणि शासकीय शाळा ओस पडू लागल्या. अतिरिक्त शिक्षकांची संख्या, तुकड्या कमी होत चालल्या. दुसरीकडे खासगी शिक्षणसंस्थांच्या योग्य आणि नियोजनबद्ध पद्धतीमुळे त्यांच्या शाळांमधील पटसंख्या वाढतच आहे. खासगी संस्थाचालक आपल्या शिक्षकांकडून काम योग्य पद्धतीने करून घेत असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खूप उंचावला. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारीही शासकीय शाळांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. खासगी शाळांत अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा असून, विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. एकंदरीत चित्र पाहता गैरसोयींमुळे शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे.