शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

‘मी कर्जमुक्त होणारच’; शिवसेनेचे अभियान

By admin | Updated: May 23, 2017 01:06 IST

शेतकऱ्यांच्या घराघरांत पोहोचविणार कर्जमुक्तीचा अर्ज

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती मिळवून देण्याचा ध्यास घेतलेल्या शिवसेनेने आता शेतकऱ्यांसाठी ‘मी कर्जमुक्त होणारच’अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत शेतकऱ्यांच्या घराघरात कर्जमुक्तीचा अर्ज पोहोचविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या पृष्ठभूमीवर जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख ते सर्कल प्रमुखांची फळी सरसावल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून पक्ष बांधणी करणाऱ्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सेनेच्या सर्व नेतेमंडळीसह खासदार, आमदार, नगरसेवकांना कामाला लावले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये शिवसंपर्क अभियान राबवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी १५ मे रोजी पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांचा आढावा घेतला. नाशिक येथे १९ मे रोजी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शिवसेनेने भाजप सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढविला. त्याच मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी जुलै महिन्यापासून राज्यात ‘लाँग मार्च’ काढणार असल्याची भूमिका पक्ष प्रमुखांनी स्पष्ट केली. जुलै महिन्यातील ‘लाँग मार्च’साठी शिवसेनेने आता ‘मी कर्जमुक्त होणारच’अभियान हाती घेतले आहे. अभियान अंतर्गत शेतकऱ्यांकडून कर्जमुक्त ीचा अर्ज लिहून घेतला जाणार आहे. त्यामध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव, गाव, कुटुंबातील एकूण सदस्य, व्यवसाय, शेती असेल तर किती एकर आहे, स्वमालकीची आहे का, कर्ज असल्यास संबंधित बँक किंवा सोसायटीचे नाव आदी माहिती संबंधित शेतकऱ्याला नमूद करावी लागणार आहे. यासोबतच सरकारला जाब विचारण्यासाठी दुसऱ्या पानावर १२ प्रश्नांची उत्तरे ‘होय’ किंवा ‘नाही’ याप्रमाणे लिहून सादर करावी लागतील. ही सर्व माहिती अर्जात नमूद केल्यानंतर सेनेचे संबंधित सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुखांमार्फत जमा केले जाणार आहेत. न्याय मागितला की हिणवल्या जाते!उत्पादन कितीही झाले तरी पिकांना हमीभाव मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. कांदा, टोमॅटो, दूध रस्त्यावर फेकण्याची पाळी का यावी, याचा कधी विचार केला जातो का, असा सवाल थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून कर्जमुक्तीच्या अर्जात भावनिक साद घालण्यात आली आहे. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिलेली तुमची भाषणे ऐका. तुमची भाषणे ऐकूनच आम्ही तुमच्या हातात सत्ता सोपवली. तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या समस्येत तसूभरही फरक पडला नाही. न्याय मागितला की ‘तरीही साले रडतात’ असे म्हणून हिणवल्या जाते.शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण ठेवत शिवसेनेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘मी कर्जमुक्त होणारच’ अभियान राबवण्याचे पक्ष प्रमुखांचे आदेश आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक सर्कलमध्ये शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना अर्ज दिल्या जातील. ते लिहून घेतल्यानंतर पक्षाकडे सादर केले जातील. त्यासाठी उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखांपासून ते सर्कल प्रमुख व गावातील शाखा प्रमुखांना कामाला लागण्याचे निर्देश आहेत. -नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना