शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

‘मी कर्जमुक्त होणारच’; शिवसेनेचे अभियान

By admin | Updated: May 23, 2017 01:06 IST

शेतकऱ्यांच्या घराघरांत पोहोचविणार कर्जमुक्तीचा अर्ज

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती मिळवून देण्याचा ध्यास घेतलेल्या शिवसेनेने आता शेतकऱ्यांसाठी ‘मी कर्जमुक्त होणारच’अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत शेतकऱ्यांच्या घराघरात कर्जमुक्तीचा अर्ज पोहोचविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्या पृष्ठभूमीवर जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उपजिल्हाप्रमुख ते सर्कल प्रमुखांची फळी सरसावल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून पक्ष बांधणी करणाऱ्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सेनेच्या सर्व नेतेमंडळीसह खासदार, आमदार, नगरसेवकांना कामाला लावले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये शिवसंपर्क अभियान राबवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी १५ मे रोजी पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांचा आढावा घेतला. नाशिक येथे १९ मे रोजी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शिवसेनेने भाजप सरकारवर चांगलाच हल्लाबोल चढविला. त्याच मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी जुलै महिन्यापासून राज्यात ‘लाँग मार्च’ काढणार असल्याची भूमिका पक्ष प्रमुखांनी स्पष्ट केली. जुलै महिन्यातील ‘लाँग मार्च’साठी शिवसेनेने आता ‘मी कर्जमुक्त होणारच’अभियान हाती घेतले आहे. अभियान अंतर्गत शेतकऱ्यांकडून कर्जमुक्त ीचा अर्ज लिहून घेतला जाणार आहे. त्यामध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव, गाव, कुटुंबातील एकूण सदस्य, व्यवसाय, शेती असेल तर किती एकर आहे, स्वमालकीची आहे का, कर्ज असल्यास संबंधित बँक किंवा सोसायटीचे नाव आदी माहिती संबंधित शेतकऱ्याला नमूद करावी लागणार आहे. यासोबतच सरकारला जाब विचारण्यासाठी दुसऱ्या पानावर १२ प्रश्नांची उत्तरे ‘होय’ किंवा ‘नाही’ याप्रमाणे लिहून सादर करावी लागतील. ही सर्व माहिती अर्जात नमूद केल्यानंतर सेनेचे संबंधित सर्कल प्रमुख, उपसर्कल प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुखांमार्फत जमा केले जाणार आहेत. न्याय मागितला की हिणवल्या जाते!उत्पादन कितीही झाले तरी पिकांना हमीभाव मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. कांदा, टोमॅटो, दूध रस्त्यावर फेकण्याची पाळी का यावी, याचा कधी विचार केला जातो का, असा सवाल थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून कर्जमुक्तीच्या अर्जात भावनिक साद घालण्यात आली आहे. विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिलेली तुमची भाषणे ऐका. तुमची भाषणे ऐकूनच आम्ही तुमच्या हातात सत्ता सोपवली. तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या समस्येत तसूभरही फरक पडला नाही. न्याय मागितला की ‘तरीही साले रडतात’ असे म्हणून हिणवल्या जाते.शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण ठेवत शिवसेनेने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘मी कर्जमुक्त होणारच’ अभियान राबवण्याचे पक्ष प्रमुखांचे आदेश आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक सर्कलमध्ये शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना अर्ज दिल्या जातील. ते लिहून घेतल्यानंतर पक्षाकडे सादर केले जातील. त्यासाठी उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखांपासून ते सर्कल प्रमुख व गावातील शाखा प्रमुखांना कामाला लागण्याचे निर्देश आहेत. -नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना