शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शिक्षकाची नोकरी नको रे बाबा, डी.एड.कडे विद्यार्थ्यांची पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:20 IST

जिल्ह्यातील डीएड कॉलेज- ०८ एकूण जागा- ३२० आलेले अर्ज- २४० नोकरीची हमी नाही! एकेकाळी डीएड केलेला विद्यार्थी नोकरीविना राहत ...

जिल्ह्यातील डीएड कॉलेज- ०८

एकूण जागा- ३२०

आलेले अर्ज- २४०

नोकरीची हमी नाही!

एकेकाळी डीएड केलेला विद्यार्थी नोकरीविना राहत नव्हता. परंतु आता शासनाने शिक्षक भरती बंद केली. त्यामुळे डीएड करून नोकरी मिळणार नाही. असे विद्यार्थ्यांना वाटत असल्यामुळे ते इतर अभ्यासक्रमांकडे वळले आहेत. पूर्वी डी.एड. प्रवेशासाठी रांगा लागायच्या. गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश व्हायचे. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता विद्यार्थी अभियांत्रिकी, मेडिकलसह आयटीआय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळले आहे.

प्राचार्य म्हणतात...

शिक्षक भरती बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांनी डी.एड.कडे पाठ फिरविली. हे खरे असले तरी, यंदा शिक्षक भरती होत आहे. टीईटीची परीक्षा घेण्यात येत आहे. येत्या काळात ४० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याने, डी.एड.कडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. लवकरच डी.एड.लासुद्धा सुगीचे दिवस येतील.

-विजय अग्रवाल, प्राचार्य श्री दत्तगुरू अध्यापक विद्यालय, खडकी

फोटो:

आता शासनाने टीईटी, पवित्र पोर्टल सुरू केले. त्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू केली. डीएडच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाही टीईटी परीक्षा देता येते. त्यामुळे आता परिस्थिती बदलत आहे. विद्यार्थ्यांचा डीएडकडे कल वाढत आहे. हळूहळू परिस्थिती बदलत आहे.

-दीपक गव्हाळ, प्राचार्य भाऊसाहेब बिरकड अध्यापक विद्यालय

फोटो:

डी.एड. अभ्यासक्रम करूनही नोकरीची हमी नाही. टीईटी परीक्षा दिल्यानंतरही नोकरीसाठी डोनेशन द्यावे लागते. कोणत्याच क्षेत्रात विनाडोनेशन नोकरी मिळत नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले. नोकरी नाहीतर व्यवसाय तरी करता आला पाहिजे.

-राहुल घुगरे, विद्यार्थी

आता डी.एड.ला पूर्वीसारखे महत्त्व राहिले नाही. नोकरी मिळत नाही. डीएड करूनही खासगी शाळांमध्ये मानधनावर काम करावे लागते. त्यापेक्षा आयटीआयटी, फॅशन डिझायनिंग व इतर कोर्सेस करून रोजगार मिळविता येऊ शकतो.

-अश्विनी बोरकुटे, विद्यार्थिनी