शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

हगणदरीमुक्त गावांची होणार फेरतपासणी!

By admin | Updated: November 20, 2015 02:38 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातील ३५ गावे हगणदरीमुक्त.

मनोज भिवगडे / अकोला: स्वच्छ भारत अभियानांतर्गत १६ नोव्हेंबरपर्यंंत जिल्ह्यात ३५ गावे हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली असून, हगणदरीमुक्त झालेल्या गावांची नोव्हेंबरअखेर शासनामार्फत नियुक्त राज्यस्तरीय समितीकडून फेरतपासणी करण्यात येणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत यावर्षी जिल्ह्यात १७२ गावे हगणदरीमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदमार्फत ठरविण्यात आले आहे. त्यासाठी दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांच्या घरी शौचालय बांधण्याची मोहीमदेखील जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये बेसलाइन सर्व्हेनुसार जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात गत १६ नोव्हेंबरपर्यंंत शौचालयांची ९0 टक्के कामे पूर्ण झालेली ३५ गावे ऑनलाइन हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली. ग्रामसेवकांमार्फत संबंधित गावांमध्ये करण्यात आलेल्या बेसलाइन सर्वेक्षणानुसार व त्यांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे स्वच्छ भारत अभियानच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील ही गावे ह्यऑनलाइनह्ण हगणदरीमुक्त घोषित करण्यात आली.