शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वारी हनुमानमध्ये प्रशासनाला अजून हवेत किती तरुणांचे बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

तेल्हारा : वारी (हनुमान) निसर्गसौंदर्याने नटलेले शिवकालीन धार्मिक पर्यटनस्थळ. त्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मंदिरानजीक असलेल्या आड व ...

तेल्हारा : वारी (हनुमान) निसर्गसौंदर्याने नटलेले शिवकालीन धार्मिक पर्यटनस्थळ. त्यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मंदिरानजीक असलेल्या आड व वान नदीमधील मामा-भाचा व राजन्या डोहमधील पाणी पाहिल्यानंतर पर्यटकांना पोहण्याचा मोह आवरत नाही; मात्र या डोहामधील अंतर्गत रचनेचा अभ्यास नसल्यामुळे या डोहाच्या कपारीत अडकून मृत्यू पावणाऱ्या पर्यटकांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या तीस वर्षांमध्ये २०० च्या वर पर्यटक बुडाल्याच्या नोंदी हिवरखेड व संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या अभिलेखामध्ये आहेत. विशेष म्हणजे बुडून मरण पावणारे पर्यटक २५ वर्षांच्या आतील आहेत.

गेल्या चार वर्षांपासून युवाशक्ती संघटना संचालित, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत वान फाउंडेशनने या डोहामध्ये उपाययोजना व्हाव्या, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील व जिल्हाधिकाऱ्यांनी या डोहांची पाहणीसुद्धा केली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मामा-भाचा डोह उपाययोजना समितीसुद्धा स्थापन झाली. नावीन्यपूर्ण योजनेमधून या उपाययोजना करण्याचेसुद्धा ठरले होते. पाटबंधारेच्या यांत्रिकी विभागाकडून ७६ लाख रुपये किमतीचे अंदाजपत्रकसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाले. या अंदाजपत्रकामधील त्रुटी दूर करून उपाययोजना दीर्घ मुदतीच्या व्हाव्या, ही वान फाउंडेशनची सूचना मान्य करून सुधारित अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पाटबंधारे विभागातील अंतर्गत वादात असंवेदनशील असलेल्या अधिकाऱ्यांनी वेळेच्या आत अंदाजपत्रक सादर केले नाही. पुढे आचारसंहिता निवडणुका व शासन बदलल्यामुळे उपाययोजनांची कार्यवाही खोळंबली.

-----------------------

ऑगस्ट महिन्यात पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू

मागील ऑगस्ट महिन्यात पाच पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याने उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात उपाययोजनांचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्याने सादर करण्याची मागणी वान फाउंडेशनचे उत्तम नळकांडे यांनी उपविभागीय अधिकारी अकोट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपाययोजनांच्या कार्यवाहीत खूपच दिरंगाई झाली असल्यामुळे प्रशासनाला अजून किती तरुणांचे बळी हवे आहेत, असा संतप्त सवाल वान फाउंडेशनने केला आहे.