शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

‘क्लेम’च सादर होईना, नुकसानभरपाई मिळणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST

अकोला : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी पीक विमा मिळावा म्हणून नुकसानीचे दावे ...

अकोला : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी पीक विमा मिळावा म्हणून नुकसानीचे दावे सादर करत आहेत, परंतु यासाठी असलेल्या मोबाईल ॲपच्या तांत्रिक अडचणीमुळे दावे विहीत मुदतीत सादर होत नसल्याच्या तक्रारी बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. अशाच अडचणी जिल्हाभरातील शेतकऱ्यांना येत असल्यामुळे दाव्यांअभावी विम्याची रक्कम मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नैसर्गिक आपत्ती व रोगराईमुळे पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी,यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचे छत्र घेतले. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी प्रीमिअमची रक्कम भरून आपल्या पिकांसाठी विम्याचे संरक्षण घेतले आहे. गत दोन वर्षांचा अनुभव लक्षात घेता यावर्षी तुलनेने कमी शेतकऱ्यांनी विम्याचे कवच घेतले आहे. गत आठवड्यात ढगफुटीसदृश पावसामुळे नदी नाल्यांना आलेला पूर व शेतात साचलेल्या पाण्यामुळे तब्बल ५४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक विमा मिळावा म्हणून आता शेतकऱ्यांची दावे दाखल करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. यासाठी 'क्रॉप इन्शुरन्स' मोबाईल ॲपवर झालेल्या नुकसानीची माहिती अपलोड करावी लागते. नुकसान झाल्याच्या ७२ तासांत छायाचित्र व इतर माहिती अपलोड करणे बंधनकारक आहे. परंतु, हजारो शेतकरी एकाचवेळी लॉगइन हाेत असल्याने सर्व्हरची गती मंद झाली आहे. परिणामी माहिती भरण्यात अडचणी येत आहेत. संपूर्ण माहिती भरल्यानंतर अंतिम 'क्लेम' सादर होत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

ओटीपी मिळताे पण दावा सबमिट होत नाही

नुकसानीची माहिती भरण्यासाठी मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्याचा मोबाईल व आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या ॲपद्वारे नुकसानीचे दावे सादर करणे बंधनकारक आहे. ॲप उघडण्यासाठी आधी ओटीपी टाकावा लागतो. अनेकदा ओटीपी लवकर मिळत नाही. एकदा ओटीपी मिळाल्यानंतर पुढील माहिती भरणे सोपे आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर मात्र शेवटच्या टप्प्यात ही माहिती सादरच होत नसल्याचे खिरपुरी येथील एका शेतकऱ्याने सांगितले.

विमा कंपनीच्या समन्वयकाचा फोनही लागेना

पीक विम्यासाठी जिल्ह्यासाठी नियोजित असलेल्या विमा कंपनीने तालुकानिहाय प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. तसेच जिल्ह्यासाठी एक समन्वयक आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचे त्यांच्याकडून निराकरण होणे अपेक्षित आहे; परंतु त्यांच्याशी संपर्कच होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हजारो शेतकरी एकाचवेळी लॉगईन हाेत असल्याने ॲपची गती मंदावली आहे. क्लेम सादर न झालेल्या शेतकऱ्यांनी तालुक्याचे कृषी कार्यालय किंवा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात अर्ज करावा. नुकसान झालेले शेतकरी विम्यापासून वंचित राहणार नाहीत.

- डॉ. कांताप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

मी १४ एकरावरील पिकाचा विमा काढला आहे. पावसामुळे माझ्या शेतातील पीक खरवडून गेल्यामुळे मी ॲपवर नुकसानीची माहिती अपलोड केली. परंतु, तांत्रिक कारणामुळे अपलोड झालेली माहिती सबमिट होत नाही. गत तीन दिवसांत मी अनेकदा प्रयत्न केले, परंतु क्लेम सादर झालाच नाही.

- नीलेश रामकृष्ण भिरड, शेतकरी, खिरपुरी

पिकाचे नुकसान झाल्यामुळे मी ॲपद्वारे माहिती अपलोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु, आधी ओटीपी येत नव्हता. मोठ्या प्रयत्नानंतर ओटीपी प्राप्त झाला. माहितीही अपलोड झाली. पण सादर करा या बटनवर क्लिक केल्यानंतर पुढे काहीच होत नाही.

- विश्वजित टेकाडे, शेतकरी मोरगाव सादीजन