शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
5
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
6
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
7
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
8
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
9
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
10
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
11
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
12
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
13
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
14
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
15
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
16
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
17
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
18
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
19
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
20
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका

शेतक-यांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करा!

By admin | Updated: January 8, 2015 00:37 IST

लोकमतच्या परिचर्चेत शेतीच्या अभ्यासकांनी मांडल्या शेतकर्‍यांच्या व्यथा

अकोला : यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेजह्ण महिनाभरापूर्वी जाहीर करण्यात आले; मात्र शेतकर्‍यांना प्रत्यक्ष मदत किती मिळणार आणि मदतीचे स्वरूप कसे राहील, याबाबतचा निर्णय अद्यापही सरकारकडून काढण्यात आला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत हवालदिल झालेल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, असा सूर बुधवारी ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत उमटला.ह्यलोकमतह्ण कार्यालयात पार पडलेल्या या परिचर्चा कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामदास मालवे, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, अकोला कृषी ग्राहक संघाचे अध्यक्ष हरिदास जायले पाटील उपस्थित होते. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे खरीप हंगामात जिल्ह्यात मूग, उडीद, ज्वारी इत्यादी पिके हातून गेली. तसेच सोयाबीन पिकाचे उत्पादन एकरी ५0 किलो ते एक क्विंटलच्यावर झाले नाही. पिकांचे उत्पादन बुडाल्याने जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५0 पैशाच्या आत आहे. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पृष्ठभूमीवर राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारमार्फत नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, गत ११ डिसेंबरला सात हजार कोटी रुपयांचे ह्यपॅकेजह्ण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्धारही सरकारकडून जाहीर करण्यात आला. मदतीचे पॅकेज जाहीर होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून जात आहे; मात्र दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना पीकनिहाय हेक्टरी किती मदत दिली जाणार, याबाबतचा निर्णय अद्यापही सरकारकडून काढण्यात आला नाही. मदतीचा निर्णय काढण्यात आला नसल्याने, मदत किती आणि केव्हा मिळणार, याबाबत दुष्काळी दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने नापिकीमुळे दुष्काळाच्या झळा सहन करणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, त्यासंबंधी निर्णय काढून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप सुरू करण्यात यावे, असा सूर या परिचर्चेत सहभागी मान्यवरांनी मांडलेल्या विचारातून उमटला. दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचा विचारही यावेळी उपस्थित वकत्यांनी परिचर्चेत विशद करण्यात आला.