शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

लाखपुरी येथे भीषण पाणीटंचाई; ग्रामस्थांची भटकंती

By admin | Updated: June 18, 2017 02:01 IST

दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प : ग्रामस्थांचा मोर्चा काढण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखपुरी : गावात गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प असल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे ग्रामस्थांची पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती होत आहे. लाखपुरी येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. योजनेचा पाणीपुरवठा गेल्या १0 दिवसांपासून बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पूर्णा नदीत अमरावती जिल्ह्यातील दूषित पाणी येते. गावात पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी प्राशन करावे लागत आहे. गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने ३ ते ४ दिवसांनंतर पाणी पुरवठा केला जातो. १0 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी, वापरासाठी पाणीसुद्धा मिळत नाही. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या फाट्यावर हातपंप आहे. ग्रामस्थांना तेथून पाणी आणावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनीधींचेही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकर्‍यांसह मजुरांना आपली मजुरी सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाइनवर अनेक ठिकाणी लिकेज आहेत. या लिकेजमधून गावातील सांडपाणी पाइपलाइनमध्ये जात असून, त्याचाच पुरवठा ग्रामस्थांना होत आहे. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.