शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2017 02:48 IST

काही गावांतील वीज पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात ७ जून रोजी काही ठिकाणी सायंकाळी तर काही ठिकाणी रात्री जोरदार पाऊस पडला. पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली. यामुळे काही गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला.जिल्ह्यात अकोला शहरात बुधवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्रीदेखील पाऊस सुरूच होता. तालुक्यातील बोरगाव मंजू परिसरात दुपारी ऊन पडले होते. अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे व मेघगर्जनेसह रात्री जोरदार पाऊस पडला, त्यामुळे तेथील वीज पुरवठा खंडित झाला. मंगळवारीदेखील बोरगाव मंजू येथे पावसाने हजेरी लावल्याने रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होता. बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे येथे जोरदार पाऊस पडला. तेथे मागील दोन दिवसांपासून पाऊस येत आहे. आज पाऊस येण्याचा तिसरा दिवस होता, तसेच तालुक्यातील हातरुण, मालवाडा, बोरगाव वैराळे, धामणा, शिगोली, निमकर्दा, कंचनपूर परिसरातदेखील पाऊस झाला. तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथे रात्री जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये पावसाच्या दमदार आगमनाबाबत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मृग नक्षत्रावर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, बियाणे, खते खरेदी करण्याची लगबग वाढणार आहे. बोरगाव वैराळे, सोनाळा परिसरात चार दिवसांपासून विजेचा लपंडावबोरगाव वैराळे : परिसरात गत चार दिवसांपासून वीज गायब राहते. त्यामुळे पाणीपुरवठ्यासह मजुरांचे दळणाचे वांधे झाले आहेत. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आपले मोबाइल बंद करून ठेवतात. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे.बोरगाव वैराळे, सोनाळा गावाला गायगाव उपकेंद्रावरून वीज पुरवठा करण्यात येतो. हातरुण फिडरवर अनेक गावे असल्यामुळे एका गावात थोडाही फॉल्ट झाला तर संपूर्ण गावाची वीज बंद करण्यात येते. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने रात्री वीज असणे आवश्यक आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ गायगाव वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या हातरुण येथील वीज पुरवठा पाऊस सुरू झाल्याबरोबर खंडित झाला, त्यामुळे नागरिकांवर अंधारात राहण्याची वेळ आली. वारंवार बिघाड होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. गायगाव वीज उपकेंद्राने कारभारात सुधारणा करण्याची मागणी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी केली आहे.