शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सलाइनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:36 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांमध्ये लसींचा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्पदंशासह इतर अनेक लसींचा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये तुटवडा असल्याचे १८ जुलै रोजी समोर आले आहे, तसेच साथीच्या रोगांसाठी उपाययोजनाही करण्यात आल्या नसल्याचे चित्र आहे. पुरवठा होत नसल्याने अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंश, डायरिया, हिवताप, अ‍ॅन्टी रेबीज या प्रकारातील एकही लस उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बेलखेड, तळेगाव, हिंगणी या तीन उपकेंद्रांमध्येही लस उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. आरोग्य केंद्रामध्ये तापाच्या गोळ्याही उपलब्ध नसून, रुग्णांवर करावयाच्या प्राथमिक उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा तुटवडा आहे. रुग्णांना देण्यासाठी सलाइन उपलब्ध नाहीत. ताप वाढल्यास देण्यात येणारी अ‍ॅन्टिबायोटिक औषधे मागील दोन ते तीन महिन्यांपासून उपलब्ध नाहीत. कुत्रा चावला तर त्यासाठी देण्यात येणारे इंजेक्शन नसल्याचे चित्र आहे. हातरुण येथेही औषधांचा तुटवडा आढळला, तसेच सर्पदंशाची लस उपलब्ध असली, तरी त्याचा वापरच करण्यात येत नसल्याचे चित्र आढळले. त्यामुळे सर्पदंशाच्या रुग्णाला अकोला येथे रेफर करण्यात येते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात साथरोगावर कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. कुरुम येथील स्थानिक गवरजाबाई रामनाथजी सारडा प्राथमिक आरोग्य केंद्रात काही प्रमाणात औषध साठा उपलब्ध असल्याचे आढळून आले. सर्पदंशाची लस उपलब्ध असून, औषध साठा काही प्रमाणात उपलब्ध आहे. खोकल्याचे औषध मागील सहा महिन्यांपासून संपले आहे; मात्र तरीही जिल्हा स्तरावरून आजपर्यंत उपलब्ध झाले नाही. साथरोगावर उपाययोजना म्हणून साथरोग किट तयार करण्यात आल्या आहेत. कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशाची लस उपलब्ध आहे.औषध पुरवठा मागील महिन्यात कमी होता; परंतु आता आवश्यक तो औषध पुरवठा उपलब्ध झाला आहे. पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अतिसाराच्या गोळ्या व सलाइनचा तुटवडा असल्याचे आढळले. सर्पदंश लस मात्र उपलब्ध होती. उपलब्ध आहे. कान्हेरी आणि धाबा येथे औषध साठ्यासह सर्पदंशाची लस उपलब्ध असल्याचे आढळले. बार्शीटाकळी तालुक्यात धाबा, कान्हेरी, महान, पिंजर हे चार प्राथमिक आरोग्य केंदे्र असून, २३ उपकेंदे्र आहेत. या ठिकाणी मात्र साथरोग नियंत्रणासाठी आवश्यकऔषध साठा नसल्याचे समोर आले आहे. त्याकरिता तात्पुरत्या औषधोपचाराची सुविधा असून, साथीचे आजार उद्भवल्यास प्रा. आ. केंद्रात रुग्णाला पाठविण्यात येते.अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषध साठा पुरवठाच करण्यात आल्या नसल्याचे चित्र आहे. उपकेंद्रांची अवस्था दयनिय असून कुठलीही सुविधा मिळत नाही.