शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

माणुसकीच्या भिंतीला मिळाले मदतीचे हात..

By admin | Updated: October 22, 2016 02:44 IST

शेकडो दानदात्यांनी दिले कपडे, ‘भारत एक कदम’चा उपक्रम

अकोला, दि. २१- अनेकांना समाजासाठी काहीतरी वेगळे करावे, असे मनोमन वाटत असले, तरी मदत करण्याची भावना बर्‍याचदा मनातच राहते; परंतु भारत एक कदम संस्थेने माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू करून अकोलेकरांना गोरगरीब, गरजूंच्या मदतीची एक संधी उपलब्ध करून दिली आणि पहिल्याच दिवशी माणुसकीच्या भिंतीकडे शेकडो सहृदयी दानशूरांनी मदतीचे हात पुढे केले. अनेकांच्या घरी चांगल्या व सुस्थितीतील कपडे असतात. लहान मुलांची खेळणी, चपला, जोडे, चादर, ब्लँकेट याशिवाय इतरही काही वस्तू असतात; परंतु आम्ही एकतर या वस्तू फेकून देतो किंवा जाळून टाकतो; परंतु कपड्यांचा, आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा गोरगरीब, गरजूंना काही उपयोग होऊ शकतो का, याचा आम्ही विचारच करीत नाही. भारत एक कदम संस्थेने हा विचार करून कपडे, खेळणी, चपला, जोडे, चादर, ब्लँकेट या वस्तू गोळा करून त्या गोरगरीब व गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम सुरू केला. गुरुवारी या उपक्रमाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उद्घाटन केले. यावेळी मंचावर भारत एक कदम संस्थेचे संचालक व माणुसकीच्या भिंती उपक्रमाचे संयोजक अरविंद देठे, प्रसिद्ध उद्योजक देवराव कापडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, डॉ. कमल देठे उपस्थित होते. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी समाजामध्ये दरी निर्माण होत आहे, ही दरी माणुसकीच्या विचारांनीच मिटविल्या जाऊ शकते. समाजामध्ये अनेक वंचित घटक आहेत. त्यांच्या मदतीसाठी सर्वांंनी पुढे आले पाहिजे. द्वेषाच्या भिंती तोडून माणुसकीच्या भिंती उभारण्याची समाजात गरज आहे, असे सांगत, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गोरगरीब, गरजूंसाठी सुरू केलेल्या उपक्रमात सर्वांंनी कपडे, खेळणी व इतर साहित्य देऊन मदत करावी, असे आवाहन केले. अरविंद देठे यांनी मनोगत व्यक्त करताना, सामाजिक बांधीलकी म्हणून आम्ही माणुसकीच्या भिंतीचा उपक्रम सुरू केला. कार्यक्रमादरम्यान अस्पायर संस्थेचे संचालक सचिन बुरघाटे, अँड. सुधाकर खुमकर, गणेश पोटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, शौकतअली मीरसाहेब, अनिल माहोरे, संजय चौधरी, भारती शेंडे, पुरुषोत्तम मालाणी, मनीष सेठी, प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व उमेश सापधारे आदींनीही विचार मांडले.