शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीच्या भिंतीला मिळाले मदतीचे हात..

By admin | Updated: October 22, 2016 02:44 IST

शेकडो दानदात्यांनी दिले कपडे, ‘भारत एक कदम’चा उपक्रम

अकोला, दि. २१- अनेकांना समाजासाठी काहीतरी वेगळे करावे, असे मनोमन वाटत असले, तरी मदत करण्याची भावना बर्‍याचदा मनातच राहते; परंतु भारत एक कदम संस्थेने माणुसकीची भिंत हा उपक्रम सुरू करून अकोलेकरांना गोरगरीब, गरजूंच्या मदतीची एक संधी उपलब्ध करून दिली आणि पहिल्याच दिवशी माणुसकीच्या भिंतीकडे शेकडो सहृदयी दानशूरांनी मदतीचे हात पुढे केले. अनेकांच्या घरी चांगल्या व सुस्थितीतील कपडे असतात. लहान मुलांची खेळणी, चपला, जोडे, चादर, ब्लँकेट याशिवाय इतरही काही वस्तू असतात; परंतु आम्ही एकतर या वस्तू फेकून देतो किंवा जाळून टाकतो; परंतु कपड्यांचा, आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा गोरगरीब, गरजूंना काही उपयोग होऊ शकतो का, याचा आम्ही विचारच करीत नाही. भारत एक कदम संस्थेने हा विचार करून कपडे, खेळणी, चपला, जोडे, चादर, ब्लँकेट या वस्तू गोळा करून त्या गोरगरीब व गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रेरणादायी उपक्रम सुरू केला. गुरुवारी या उपक्रमाचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उद्घाटन केले. यावेळी मंचावर भारत एक कदम संस्थेचे संचालक व माणुसकीच्या भिंती उपक्रमाचे संयोजक अरविंद देठे, प्रसिद्ध उद्योजक देवराव कापडे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, डॉ. कमल देठे उपस्थित होते. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी समाजामध्ये दरी निर्माण होत आहे, ही दरी माणुसकीच्या विचारांनीच मिटविल्या जाऊ शकते. समाजामध्ये अनेक वंचित घटक आहेत. त्यांच्या मदतीसाठी सर्वांंनी पुढे आले पाहिजे. द्वेषाच्या भिंती तोडून माणुसकीच्या भिंती उभारण्याची समाजात गरज आहे, असे सांगत, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गोरगरीब, गरजूंसाठी सुरू केलेल्या उपक्रमात सर्वांंनी कपडे, खेळणी व इतर साहित्य देऊन मदत करावी, असे आवाहन केले. अरविंद देठे यांनी मनोगत व्यक्त करताना, सामाजिक बांधीलकी म्हणून आम्ही माणुसकीच्या भिंतीचा उपक्रम सुरू केला. कार्यक्रमादरम्यान अस्पायर संस्थेचे संचालक सचिन बुरघाटे, अँड. सुधाकर खुमकर, गणेश पोटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, वीज वितरण कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. मधू जाधव, शौकतअली मीरसाहेब, अनिल माहोरे, संजय चौधरी, भारती शेंडे, पुरुषोत्तम मालाणी, मनीष सेठी, प्रा.डॉ. धैर्यवर्धन पुंडकर व उमेश सापधारे आदींनीही विचार मांडले.