शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

गुरुदेव भक्तांची लोकचळवळ आणखी व्यापक व्हावी!

By admin | Updated: August 14, 2014 02:02 IST

राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत नसणे हे दुर्दैवच : आचार्य वेरूळकर यांनी व्यक्ती केली खंत.

विवेक चांदूरकर/ अकोलाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव राष्ट्रीय थोर पुरुषांच्या यादीत नाही, हे आश्‍चर्यकारक आहे. संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वेचणार्‍या तुकडोजी महाराजांना थोर पुरुषांच्या यादीतून डावलणे, हे शासनाचे विस्मरण आहे की काय, हेच कळत नसल्याची खंत राष्ट्रसंतांच्या विचारांच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करणारे आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी व्यक्त केली. या मुद्यावर गुरूदेव भक्तांनी सुरू केलेली लोकचळवळ आणखी व्यापक करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.राष्ट्रसंतांचे नाव राष्ट्रीय थोर पुरुषांच्या यादीत शासनाने समाविष्ट केले नसल्याचे वृत्तह्यलोकमतह्णने प्रकाशित केले होते. गुरूदेव भक्तांमध्ये शासनाच्या या धोरणामुळे रोष व्यक्त व्हायला लागला. गुरूदेव भक्तांनी ९ ऑगस्टपासून संपूर्ण विदर्भात क्रांतीज्योत यात्रा काढली आहे. या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अकोल्यात समाजसेवक गणेश पोटे व चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषण मंडपास भेट देण्यासाठी आचार्य वेरूळकर अकोल्यात आले असता, त्यांनी लोकमतशी केलेली खास बातचित.शासनाने राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत का समाविष्ट केले नाही? उत्तर - तुकडोजी महाराज यांचे कार्य समाजासाठी प्रेरक आहे. शासनाने थोर पुरुषांची यादी बनविताना कोणते निकष लावले, हे बघणे गरजेचे आहे. यादीमध्ये कुणाकुणाचे नाव आहे व राष्ट्रसंताचेच का नाही, याचा शोध घ्यायला हवा. या मुद्यावरून सुरू झालेल्या लोकचळवळीबद्दल काय मत आहे?उत्तर - राज्य शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावावरून राज्यभर अनेक योजना सुरू केल्या. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव दिले, कारण तुकडोजी महाराज थोर पुरूष आहेत म्हणूनच. चिंतामणराव देशमुख यांनी पंडित नेहरू पंतप्रधान असताना ग्रामगीतेचे १४ भाषांमध्ये भाषांतर करून त्यांनी सांगितलेल्या ग्राम उद्धाराची संकल्पना गावागावात राबविली तर देशाचा विकास होऊ शकेल, असे लोकसभेत सांगितले होते. कारण की तुकडोजी महाराज हे थोर पुरूष आहे म्हणूनच. मग त्यांचे नाव राष्ट्रीय थोर पुरुषांच्या यादीत का नाही? गुरूदेव भक्तांनी या मुद्यावर घेतलेली लोकचळवळीची भूमिका निश्‍चितच योग्य आहे. ही लोकचळवळ आणखी व्यापक व्हायला हवी. शासनाची भूमिका काय असायला हवी?उत्तर - राष्ट्रसंतांचे नाव थोर पुरुषांच्या यादीत का समाविष्ट केले नाही, ही शासनाची चूक आहे. शासनाने आता ही चूक सुधारून राष्ट्रसंतांचे नाव यादीत त्वरित समाविष्ट करायला हवे. यापुढे आपली भूमिका काय असणार आहे? उत्तर - शासनाने राष्ट्रसंतांचे नाव यादीत समाविष्ट केले नाही तर गावागावांतील गुरुदेव सेवा मंडळं विविध प्रकारची आंदोलनं करणार आहेत. हजारो लोक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. आंदोलनाने शासनापुढे समस्या निर्माण होऊ शकते. या यादीतील अन्य नावांवर आक्षेप आहे का? उत्तर - अन्य नावांवर मला आक्षेप नाही. राष्ट्रसंतांचे नाव यादीत समाविष्ट करावे, एवढीच अपेक्षा आहे.