शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

रात्र शाळेतून जीवन प्रकाशमय करणारे ‘गुरू’

By admin | Updated: July 19, 2016 01:55 IST

जागृतीचा कष्टकरी मुलांसाठीचा जागर; रात्र शाळांमध्ये ‘जागृती’चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

अकोला : विद्यार्थ्यांंचा शोध घेणे, त्यांच्या पालकांना समजावून सांगत शाळेत पाठवा, असा आग्रह धरणे, शाळेत आलेल्या मुलांना शिक्षणाचे धडे देतानाच माणूस म्हणून घडविण्याचे संस्कार करणे, सकाळची शाळा करून रात्री या सर्व विद्यार्थ्यांना शिकवणे, या सर्व गोष्टी वाचल्यावर कुणालाही जुन्या काळातील एखाद्या शिक्षकाची आठवण येणे साहजिकच आहे. आताच्या काळात असे होत नाही, असा शेराही मारून आपण मोकळे होऊ. पण, अकोल्यात हे घडत आहे. गेल्या तीस वर्षांंपासून विनायक देशमुख नावाचे हाडाचे शिक्षक हे कार्य ह्यजागृती नाईट स्कूलह्णच्या माध्यमातून करीत आहेत. ही शाळा म्हणजे भरकटण्याच्या मार्गावर असलेल्या, परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागणार्‍या शेकडो विद्यार्थ्यांंसाठी नवा आशेचा किरण ठरला असून, विनायक देशमुख हे या रात्र शाळेतून जीवन प्रकाशमय करणारे ह्यगुरूह्ण ठरले आहेत.राज्यात दोनशे रात्र शाळा असून, त्यामध्ये १६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मात्र या सर्व शाळांमध्ये ह्यजागृतीह्णचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. १९८७ साली या शाळेची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. गरीब, हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबामध्ये मुलांना शिकविण्याची ऐपत नसते, त्याला कामाला पाठवले तर तेवढाच संसाराला हातभार या हेतूने आई-बाप सुद्धा मुलांच्या शिक्षणापेक्षा उत्पन्नाला महत्त्व देतात. त्यामुळे शिक्षणाची इच्छा व बुद्धिमत्ता असलेल्या अनेकांना शिक्षणाची वाट सोडून द्यावी लागते. ही बाब हेरून विनायक देशमुख यांनी अशा मुलांचा शोध घेतला, त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले, पालकांना समजावले, मुलांना हवे तर काम करू द्या, पण रात्री शाळेत पाठवा, असा पर्याय दिला. मुले तयार होतीच पालकांनी होकार दिला अन् जागृतीचा जागर सुरू झाला तो आजतागायत.अकोल्यातील झोपडपट्टी, गावातून शहरांमध्ये रोजगारासाठी स्थायिक झालेले कुटुंब यांचा शोध घेत विनायकरावांनी जमविलेल्या विद्यार्थ्यांंना पैलू पाडत त्यांच्यामधून हिरे घडविले. घरातील कलह व गरिबी या दोन्ही गोष्टींमुळे अनेक मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळली होती. या मुलांना चांगले वळण लावीत शिक्षणाच्या मार्गावर आणण्याचे काम देशमुखांनी केले. आज या मधील अनेक मुले चांगल्या हुद्यावर नोकरीला आहेत, कुणाचा व्यवसाय सुरू आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती तर कधीची संपली आहे. कुठलीही फी न घेता सुरू असलेल्या ज्ञानयज्ञामध्ये समाजाचाही मोठा हातभार लागल्याचे विनायकराव प्रांजळपणे सांगतात. सध्याही सकाळी शाळेत नोकरी केल्यावर जागृती नाईट स्कूलचे मुख्याध्यापक पद तेवढय़ाच आत्मीयतेने सांभाळत आहेत. शासनाने कलचाचणी आता सुरू केली, पण या शाळेतील मुलगा दहावी झाला, की त्याने कोणता मार्ग धरावा याचा कल सुरुवातीपासून सांगितला जातो. प्रत्येक वर्षी दहावीचा निकाल हा ८0 टक्क्याच्या वर अन् गुणवत्ता यादी असताना गुणवत्ता यादीत स्थान हा शाळेचा लौकिक विनायकरावांनी जपलेल्या ह्यगुरूपणह्ण या वैशिष्ट्यामुळे कायम राहिला आहे.