शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

भूजल पातळी साडेपाच फुटांनी घटली

By admin | Updated: June 16, 2016 02:20 IST

अकोला जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट; भूजलाचा अतिरिक्त उपसा कारणीभूत.

अकोला: गत दोन-तीन वर्षांपासून होत असलेले अत्यल्प पर्जन्यमान, भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा तसेच जलपुनर्भरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी गत पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ५.२८ फूट अर्थात १.६0 मीटरने घटली आहे. यावर्षीही पावसाने दगा दिला, तर जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र जलसंकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भूजल पातळी तपासण्यासाठी तसेच या पातळीत वाढ व्हावी, याकरिता उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाची निर्मिती केली आहे. या विभागातील भूवैज्ञानिक दर तीन महिन्यांनी भूजल पातळीचे अवलोकन करतात. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ८१ निरीक्षण विहिरी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. गत मे महिन्यात या ८१ निरीक्षण विहिरींमधील जलपातळीचे अध्ययन करण्यात आले. गत पाच वर्षांंतील मे महिन्यातील सरासरीच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळी ५.२८ फूट अर्थात १.६0 मीटरने घटल्याचे आढळून आले. तालुकानिहाय आकडेवारीवरून ही स्थिती अधिक स्पष्ट होते. अकोला तालुक्याची वर्ष २0११ ते २0१४ पर्यंतची सरासरी भूजल पातळी ९.९४ मीटर होती; परंतु वर्ष २0१६ मध्ये ती १0.८८ पर्यंंत खाली आली. याचा अर्थ भूजल पातळी १. १९ मीटरने घटली. आकोट तालुक्याची भूजल पातळी गत पाच वर्षांंच्या सरासरीच्या तुलनेत २.३३ मीटर, बाश्रीटाकळी तालुका २.२0 मीटर, बाळापूर 0.९६ मीटर, मूर्तिजापूर १.00 मीटर, पातूर १.६९ मीटर तसेच तेल्हारा तालुक्याची भूजल पातळी १.८१ मीटरने घटली आहे. जिल्ह्याची एकंदर भूजल पातळी सरासरी १.६0 मीटरने घटली आहे.