शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळी साडेपाच फुटांनी घटली

By admin | Updated: June 16, 2016 02:20 IST

अकोला जिल्ह्याच्या भूजल पातळीत घट; भूजलाचा अतिरिक्त उपसा कारणीभूत.

अकोला: गत दोन-तीन वर्षांपासून होत असलेले अत्यल्प पर्जन्यमान, भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा तसेच जलपुनर्भरणाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी गत पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ५.२८ फूट अर्थात १.६0 मीटरने घटली आहे. यावर्षीही पावसाने दगा दिला, तर जिल्ह्यातील नागरिकांना तीव्र जलसंकटाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भूजल पातळी तपासण्यासाठी तसेच या पातळीत वाढ व्हावी, याकरिता उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाची निर्मिती केली आहे. या विभागातील भूवैज्ञानिक दर तीन महिन्यांनी भूजल पातळीचे अवलोकन करतात. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ८१ निरीक्षण विहिरी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. गत मे महिन्यात या ८१ निरीक्षण विहिरींमधील जलपातळीचे अध्ययन करण्यात आले. गत पाच वर्षांंतील मे महिन्यातील सरासरीच्या तुलनेत यावर्षी भूजल पातळी ५.२८ फूट अर्थात १.६0 मीटरने घटल्याचे आढळून आले. तालुकानिहाय आकडेवारीवरून ही स्थिती अधिक स्पष्ट होते. अकोला तालुक्याची वर्ष २0११ ते २0१४ पर्यंतची सरासरी भूजल पातळी ९.९४ मीटर होती; परंतु वर्ष २0१६ मध्ये ती १0.८८ पर्यंंत खाली आली. याचा अर्थ भूजल पातळी १. १९ मीटरने घटली. आकोट तालुक्याची भूजल पातळी गत पाच वर्षांंच्या सरासरीच्या तुलनेत २.३३ मीटर, बाश्रीटाकळी तालुका २.२0 मीटर, बाळापूर 0.९६ मीटर, मूर्तिजापूर १.00 मीटर, पातूर १.६९ मीटर तसेच तेल्हारा तालुक्याची भूजल पातळी १.८१ मीटरने घटली आहे. जिल्ह्याची एकंदर भूजल पातळी सरासरी १.६0 मीटरने घटली आहे.