शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चिक निधीला शासनाची हिरवी झेंडी; महापालिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:22 IST

अकोला : मागील चार वर्षांमध्ये विविध विकासकामांसाठी दिलेला निधी खर्च करू न शकणार्‍या राज्यातील महापालिकांना नगरविकास विभागाने दिलासा दिला ...

अकोला : मागील चार वर्षांमध्ये विविध विकासकामांसाठी दिलेला निधी खर्च करू न शकणार्‍या राज्यातील महापालिकांना नगरविकास विभागाने दिलासा दिला आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीत प्राप्त झालेला निधी विकासकामांवर खर्च करण्यासाठी शासनाने फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत दिली आहे.

राज्यातील महापालिका, नगरपरिषद तसेच नगरपालिका क्षेत्रामध्ये विकासकामे करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासनामार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. प्राप्त निधीचे नियोजन करीत नागरी स्वायत्त संस्थांनी दिलेल्या मुदतीत विकासकामे करणे अपेक्षित आहे. परंतु अनेकदा निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे विकासकामे पूर्ण केली जात नाही. अशावेळी शासनाचा निधी अखर्चिक राहतो. प्रशासनाच्या लालफितीशाहीमुळे देखील अनेक विकासकामे रखडल्याचे पहावयास मिळते. अशावेळी हा निधी शासनाकडे परत करणे अपेक्षित आहे. दरम्यान, २०१६ ते २०१९ या कालावधीत शासनाकडून प्राप्त निधी अखर्चिक असल्यास त्याचे तातडीने विनियोजन करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. यासाठी फेब्रुवारी २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याकालावधीत हा निधी खर्च न केल्यास शासनाकडे परत करावा लागणार आहे.