शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकात घातल्या शेळ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST

मूर्तिजापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गत आठवडाभरापासून दिवसांपासून बाजारपेठ व गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजार ...

मूर्तिजापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गत आठवडाभरापासून दिवसांपासून बाजारपेठ व गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजार बंद आहेत. याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, शेतात पिकविलेला भाजीपाला सडत असल्याचे चित्र आहे. लागवडी खर्चही निघत नसल्याने तालुक्यातील अन्वी मिर्झापूर येथील शेतकरी शुभाष काशिनाथ वानखडे यांनी तीन एकरांतील उभ्या शेतात शेळ्या चराईसाठी घातल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याची मागणी होत आहे.

लॉकडाऊन असल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे भाजीपाला विकल्या जात नाही. शेतकरी शुभाष वानखडे यांच्या शेतात भेंडी, गवार, चवळी व टोमाटो अशा प्रकारचे पीक होते. बंदमुळे भाजी काढण्याचा कालावधी संपल्याने ती जरड अवस्थेत आली आहे. भविष्यात अशा भाज्यांना मागणी नसल्याने शेतात गुरे चारण्यापासून पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------

बाजारपेठेत भाव नाही!

कोरोनाच्या काळात भाजीपाल्यांना जसा पाहिजे तसा भाव नाही. त्यामुळे शेतीत काबाडकष्ट करून शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल होत नाही. गत महिन्यात मूर्तिजापूर भाजी मार्केटमध्ये पहिल्या काढणीचा भाजीपाला जेव्हा नेण्यात आला होता, तेव्हा काढणीचा खर्च तर सोडाच, गाडी भाड्याचाही वसूल झाले नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

--------------------------

नुकसान भरपाई देण्याची मागणी

यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. तालुक्यात भुईमूग, कांदा, भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली आहे. अति तापमानामुळे भुईमुगाला शेंगाच लागल्या नसल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली, तसेच बाजारपेठ बंदचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी सुभाष वानखेडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.