शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकात घातल्या शेळ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:18 IST

मूर्तिजापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गत आठवडाभरापासून दिवसांपासून बाजारपेठ व गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजार ...

मूर्तिजापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे गत आठवडाभरापासून दिवसांपासून बाजारपेठ व गेल्या काही दिवसांपासून आठवडी बाजार बंद आहेत. याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून, शेतात पिकविलेला भाजीपाला सडत असल्याचे चित्र आहे. लागवडी खर्चही निघत नसल्याने तालुक्यातील अन्वी मिर्झापूर येथील शेतकरी शुभाष काशिनाथ वानखडे यांनी तीन एकरांतील उभ्या शेतात शेळ्या चराईसाठी घातल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्याची मागणी होत आहे.

लॉकडाऊन असल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे भाजीपाला विकल्या जात नाही. शेतकरी शुभाष वानखडे यांच्या शेतात भेंडी, गवार, चवळी व टोमाटो अशा प्रकारचे पीक होते. बंदमुळे भाजी काढण्याचा कालावधी संपल्याने ती जरड अवस्थेत आली आहे. भविष्यात अशा भाज्यांना मागणी नसल्याने शेतात गुरे चारण्यापासून पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------------------

बाजारपेठेत भाव नाही!

कोरोनाच्या काळात भाजीपाल्यांना जसा पाहिजे तसा भाव नाही. त्यामुळे शेतीत काबाडकष्ट करून शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल होत नाही. गत महिन्यात मूर्तिजापूर भाजी मार्केटमध्ये पहिल्या काढणीचा भाजीपाला जेव्हा नेण्यात आला होता, तेव्हा काढणीचा खर्च तर सोडाच, गाडी भाड्याचाही वसूल झाले नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

--------------------------

नुकसान भरपाई देण्याची मागणी

यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने तालुक्यात बागायती क्षेत्र वाढले आहे. तालुक्यात भुईमूग, कांदा, भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली आहे. अति तापमानामुळे भुईमुगाला शेंगाच लागल्या नसल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली, तसेच बाजारपेठ बंदचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी सुभाष वानखेडे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.