शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

पाणीटंचाइ निवारणाची कामे तातडीने पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST

अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाइचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी पाणीटंचाइ निवारणाच्या उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा ...

अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाइचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी पाणीटंचाइ निवारणाच्या उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी गुरुवारी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या सभेत दिले.

जिल्हयातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाइच्या समस्येचा सामना करावा लागतो. यावर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाइची समस्या गंभीर होणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन, पाणीटंचाइ निवारणाच्या कृती आराखड्यात मंजूर उपाययोजनांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह संबंधित यंत्रणांना या सभेत दिले. नियोजनाअभावी जिल्ह्यातील काही भागात पाणीटंचाइचा प्रश्न जाणवत असून, तेल्हारा तालुक्यातील काही पाणीटंचाइग्रस्त गावांमध्ये पाणीटंचाइ निवारणासाठी बोअरवेलची कामे करण्यात यावी किंवा टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी सदस्य संजय अढाऊ यांनी सभेत केली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आलेल्या यासभेत उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुभाष पवार, समितीचे सदस्य संजय अढाऊ, सुष्मिता सरकटे यांच्यासह जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा व लघु सिंचन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जलवाहिनी दुरुस्तीच्या कामात

अनियमितता; चौकशीचे निर्देश

जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामात अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद कृषी व पशुसंर्वर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी समितीच्या मागील सभेत केली होती. त्यानुषंगाने यासंदर्भात काय कार्यवाही झाली, अशी विचारणा करीत जलवाहिनीच्या कामातील अनियमिततेची २२ एप्रिल रोजी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी सभेत दिले.