शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याचा लाभ मिळवून द्या!

By admin | Updated: August 15, 2015 01:37 IST

शेतक-यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन.

अकोला: गतवर्षी झालेल्या पीक नुकसानाची भरपाई म्हणून विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली; परंतु सदर रक्कम बँक खात्यामध्ये जमा न होता कर्ज खात्यामध्ये वळती होत आहे. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित रहात आहेत. पीकविम्याच्या रकमेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन शेतकर्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सादर केले. गतवर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानापोटी पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांना विमा कंपन्यांकडून विम्याची रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणे अपेक्षित होते; परंतु सदर रक्कम कर्ज खात्यांमध्ये वळती होत आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन झालेले असताना पीकविम्याच्या रकमेतून व्याजाची वसुली करणे हा शेतकर्‍यांवर अन्याय आहे. पिकाचा विमा काढण्याची सूचना करूनही गटसचिवांनी विमा काढला नाही. काही शेतकर्‍यांच्या कर्जामधून विम्याची रक्कमही कपात केली आहे. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून पात्र लाभार्थींना विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली. शेतकर्‍यांची मागणी मान्य न झाल्यास २0 ऑगस्ट रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकर्‍यांनी दिला आहे.