शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

पीकविम्याचा लाभ मिळवून द्या!

By admin | Updated: August 15, 2015 01:37 IST

शेतक-यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन.

अकोला: गतवर्षी झालेल्या पीक नुकसानाची भरपाई म्हणून विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम देण्यात आली; परंतु सदर रक्कम बँक खात्यामध्ये जमा न होता कर्ज खात्यामध्ये वळती होत आहे. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या रकमेपासून वंचित रहात आहेत. पीकविम्याच्या रकमेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन शेतकर्‍यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सादर केले. गतवर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानापोटी पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांना विमा कंपन्यांकडून विम्याची रक्कम देण्यात आली आहे. ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणे अपेक्षित होते; परंतु सदर रक्कम कर्ज खात्यांमध्ये वळती होत आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन झालेले असताना पीकविम्याच्या रकमेतून व्याजाची वसुली करणे हा शेतकर्‍यांवर अन्याय आहे. पिकाचा विमा काढण्याची सूचना करूनही गटसचिवांनी विमा काढला नाही. काही शेतकर्‍यांच्या कर्जामधून विम्याची रक्कमही कपात केली आहे. त्यामुळे शेतकरी पीकविम्याच्या लाभापासून वंचित आहेत. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून पात्र लाभार्थींना विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली. शेतकर्‍यांची मागणी मान्य न झाल्यास २0 ऑगस्ट रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकर्‍यांनी दिला आहे.