शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी महिलांची टोळी तांबे-पितळचे भांडे घेऊन पसार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:23 IST

तांबे व पितळचे भांड्यांचे दर चांगलेच वाढले आहे. ग्रामीण भागात अशा तांब्या, पितळाचे भांडे पारंपरिकरीत्या जोपासून ठेवले जातात. याच ...

तांबे व पितळचे भांड्यांचे दर चांगलेच वाढले आहे. ग्रामीण भागात अशा तांब्या, पितळाचे भांडे पारंपरिकरीत्या जोपासून ठेवले जातात. याच पारंपरिक ठेव्यावर अज्ञात महिलांच्या टोळीने आलेगावमध्ये अगदी राजरोसपणे डल्ला मारल्याचे बोलले जाते. या भांड्यांना पुन्हा चमकविणे सहज सोपे नसते. नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन हे भांडे चमकवून नवे करून देण्याच्या नावाखाली अज्ञात महिलांनी गावातून भांडे गोळा केले. सोबतच काही कुकरसुद्धा दुरुस्तीसाठी जमा केले. तीन लिटरच्या कुकरला पाच लिटरमध्ये बदलवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. भांडे चमकण्यासाठी आणि कुकर दुरुस्त करण्यासाठी गावातील महिलांकडून पैसेसुद्धा घेण्यात आले. भांडे आणि पैसे घेऊन गेलेल्या अनोळखी महिला पुन्हा गावात फिरकल्या नाहीत किंवा कोणालाही दिसल्या नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आता गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने या महिलांच्या टोळीचा गावकरी शोध घेत आहेत.

तांब्या पितळाचे भांडे चमकविणे हा आमचा व्यवसाय असल्याचे महिलांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना घरातील भांडे दिले. पण, त्या महिला परत आल्याच नाहीत.

- ज्योती दत्तात्रय काळदाते

त्या महिलांच्या बोलण्यावरून भांड्यांचा त्यांचा मूळ व्यवसाय असावा असे वाटले. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला. आता आमचे भांडेही गेले आणि पैसेही गेले.

- उमाबाई गजानन मुर्तडकर

आलेगावमधून या प्रकारची कोणतीही तक्रार आली नाही, अथवा याबाबत कोणी माहितीही दिली नाही. तरी नागरिकांनी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवून काही देऊ नये व सावध राहावे.

- राहुल वाघ, ठाणेदार, चान्नी पोलीस स्टेशन