शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप कायम राहणे आवश्यक!

By admin | Updated: September 3, 2015 01:55 IST

प्रशासनाकडून नियमांचा बडगा नको; जाचक अटी शिथिल करा!

अकोला : गणेशोत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने ठरवून दिलेले नियम व अटी हितकारक आहेत. मात्र, या नियमांच्या आडून लादल्या जात असलेल्या अटी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार्‍यांसाठी जाचक ठरत आहेत. उत्सवाचे पावित्र राखण्यासाठी सार्वजनिक स्वरूप नक्कीच जतन केलं जाईल. मात्र, आडमुठे धोरण न स्वीकारता प्रशासनानेदेखील नियमांमध्ये शिथिलता आणण्यासाठी दोन पावले पुढे आले पाहिजे, असा सूर बुधवारी दुपारी ह्यसार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरूपह्ण या विषयावर ह्यलोकमतह्ण शहर कार्यालयात पार पडलेल्या परिचर्चेत उमटला. या परिचर्चेत १२३ वर्षांची परंपरा लाभलेल्या अकोल्यातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तथा सामाजिक जाणिवेतून गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. बाप्पाचे येत्या १७ सप्टेंबर रोजी आगमन होत आहे. अकोल्यातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून हजारो गणेशोत्सव मंडळे दरवर्षी हा सण साजरा करतात. स्वतंत्र्यासाठी देशवासीयांनी किमान धार्मिक भावनेतून तरी एकत्रित यावे, या जाणिवेतून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली होती. काळानुरूप हा उत्सव साजरा करण्याची पद्धत बदलली. सनई-चौघड्यांची जागा ह्यहायटेक डीजे सिस्टीमने घेतली, शाडू मातीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीं आल्या. देशातील उत्सवांवर ह्यचायना मेडह्ण वस्तूंनी ताबा मिळविला आहे. लोकसंख्या वाढल्याने या सणाचा उत्साह प्रत्येक चौका-चौकांत आणि गल्ली बोळय़ांमध्ये दिसून येतो. प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांकरिता अनेक नियम व अटी तयार केल्या आहेत. ज्यात रात्री दहानंतर लाऊडस्पिकर वाजवू नये, किमान १२ फूट अंतर ठेवून मंडळाने मंडप उभारावा, विसर्जन मिरवणूक रात्री १२ पूर्वीच संपवावी. उत्सवादरम्यान निर्माण होणारी जातीय तेढ, भेदभाव व तंटे रोखण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने तयार केलेले नियम गणेशोत्सव मंडळांकरिता जाचक सिद्ध ठरत आहेत. गेल्या काही वर्षांचे अनुभव लक्षात घेता उत्सवादरम्यान व मिरवणुकीदरम्यान शासनाच्या अटी व नियम मंडळांकरिता जाचक सिद्ध ठरत आहेत. गणेशोत्सवाचं सार्वजनिक स्वरूप कायद्याच्या चौकटीत राहून जतन केलं जाईल. मात्र, त्यासाठी प्रशासनाने आडमुठे धोरण सोडावे व नियमांमध्ये शिथिलता आणावी, असा सूर परिचर्चेत उमटला.