शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

तेल्हारा शहरात बीएसएनएल मोबाईल सेवेचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:34 IST

तेल्हारा: शहरात बीएसएनएल तसेच इतर मोबाईल कंपन्यांचे नेटवर्कअभावी गत अनेक महिन्यांपासून ग्राहक त्रस्त झाले आहेत. मोबाईल सेवा तासनतास ...

तेल्हारा: शहरात बीएसएनएल तसेच इतर मोबाईल कंपन्यांचे नेटवर्कअभावी गत अनेक महिन्यांपासून ग्राहक त्रस्त झाले आहेत. मोबाईल सेवा तासनतास खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

शहरात दैनंदिन कामांसाठी ग्रामीण भागातून शेकडो नागरिक दाखल होतात. त्यामध्ये तहसील कार्यालय, बँका, दुय्यम निबंधक कार्यालय, ऑनलाईन क्लास, एलआयसी सेंटर, तलाठी कार्यालय, सेतू यासह अनेक सेवा देणारी ऑनलाइन केंद्र नेटवर्कअभावी बंद पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना दिवसभर कनेक्टिव्हीटीची प्रतीक्षा करीत ताटकळत बसावे लागत आहे. कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने बँक व शासकीय कार्यालयांसमोर गर्दी होत असल्याने कोरोनाची भीती वाढली आहे. तसेच दिवसभरही काम होत नसल्याने नागरिकांना खाली हात परतावे लागते. त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन मोबाईल सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.