शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सिंचन प्रकल्पांच्या निधीत चाळीस टक्के कपात!

By admin | Updated: March 12, 2015 01:42 IST

आता लक्ष अर्थसंकल्पाकडे

राजरत्न सिरसाट /अकोला: सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाकरिता सुधारित प्रशासकीय आणि मान्यता मागणीनुसार निधी मिळाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायम असतानाच शासनाने यावर्षी सिंचन प्रकल्पावरील बांधकामाच्या निधीत ४0 टक्के कपात केल्याने काम करणार्‍या यंत्रणाची प्रचंड कोंडी झाली आहे. अकोला जिल्हय़ातील नेरधामणा, उमा, कवठा बॅरेज, बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव व इतर रखडलेल्या प्रकल्पांच्या कामासाठी निधीची गरज असल्याचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील तरतुदीकडे अधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे. पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामासाठी मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने आजमितीस २ लाख ४७ हजार हेक्टर सिंचन अनुशेष कायम आहे. बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव या मेगा प्रकल्पाच्या कामासाठी आर्थिक रसद कमी पडत असून, अकोला जिल्हय़ातील नेरधामणा, काटेपूर्णा, घुंगशी, उमा बॅरेजेस या कामांना पूरक निधी नसल्याने कामांची गती खुंटली आहे. काटीपाटी, कंचनपूर हे प्रकल्पही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. अमरावती जिल्हय़ातील अप्पर वर्धा प्रकल्पाची पाटचार्‍याची कामे रखडली आहेत. राज्यपालांच्या निर्देशानुसार पश्‍चिम विदर्भातील १0२ प्रकल्प अनुशेष कार्यक्रमात टाकली आहेत. अकोला जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई संग्राहक, आकोट तालुक्यातील पोपटखेडा -२, या दोन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली; पण निधीची पूर्तता झाली नसल्याने या कामांना विलंब होत आहे. बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव हा खारपाणपट्टय़ातील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या पाण्याचा शेवट खारपाणपट्टय़ात म्हणजे अकोला तालुक्यात राहणार असल्याने, या भागातील नागरिक, शेतकर्‍यांना गोडे पाणी मिळणार आहे; पण या प्रकल्पाच्या बांधकामासाठी मंजूर झालेल्या २९५ कोटी निधीपैकी ४0 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाची गती खुंटणार आहे