शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

सिंचन प्रकल्पांच्या निधीत चाळीस टक्के कपात!

By admin | Updated: March 12, 2015 01:42 IST

आता लक्ष अर्थसंकल्पाकडे

राजरत्न सिरसाट /अकोला: सिंचन प्रकल्पांच्या बांधकामाकरिता सुधारित प्रशासकीय आणि मान्यता मागणीनुसार निधी मिळाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील सिंचनाचा अनुशेष कायम असतानाच शासनाने यावर्षी सिंचन प्रकल्पावरील बांधकामाच्या निधीत ४0 टक्के कपात केल्याने काम करणार्‍या यंत्रणाची प्रचंड कोंडी झाली आहे. अकोला जिल्हय़ातील नेरधामणा, उमा, कवठा बॅरेज, बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव व इतर रखडलेल्या प्रकल्पांच्या कामासाठी निधीची गरज असल्याचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील तरतुदीकडे अधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे. पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या कामासाठी मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने आजमितीस २ लाख ४७ हजार हेक्टर सिंचन अनुशेष कायम आहे. बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव या मेगा प्रकल्पाच्या कामासाठी आर्थिक रसद कमी पडत असून, अकोला जिल्हय़ातील नेरधामणा, काटेपूर्णा, घुंगशी, उमा बॅरेजेस या कामांना पूरक निधी नसल्याने कामांची गती खुंटली आहे. काटीपाटी, कंचनपूर हे प्रकल्पही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. अमरावती जिल्हय़ातील अप्पर वर्धा प्रकल्पाची पाटचार्‍याची कामे रखडली आहेत. राज्यपालांच्या निर्देशानुसार पश्‍चिम विदर्भातील १0२ प्रकल्प अनुशेष कार्यक्रमात टाकली आहेत. अकोला जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यातील वाई संग्राहक, आकोट तालुक्यातील पोपटखेडा -२, या दोन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली; पण निधीची पूर्तता झाली नसल्याने या कामांना विलंब होत आहे. बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव हा खारपाणपट्टय़ातील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या प्रकल्पाच्या पाण्याचा शेवट खारपाणपट्टय़ात म्हणजे अकोला तालुक्यात राहणार असल्याने, या भागातील नागरिक, शेतकर्‍यांना गोडे पाणी मिळणार आहे; पण या प्रकल्पाच्या बांधकामासाठी मंजूर झालेल्या २९५ कोटी निधीपैकी ४0 टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाची गती खुंटणार आहे