शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

कामगंधे सापळे ‘बोंडअळी’ आगमानाचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 15:58 IST

अकोला : कामगंध सापळे ‘बोंडअळी’ येण्याची सूचना देत असल्याने शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीच्या नायनाटासाठी शिफारशीप्रमाणे एकात्मिक किड व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.

ठळक मुद्देयावर्षी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत.पहिली उपाययोजना म्हणजे कपाशीच्या शेतात एकरी दोन कामगंध सापळे लावण्या शिफारस करण्यात आली.हे कामगंध सापळे (फेरोमेन ट्रॅप) बोंडअळी अगोदरच्या अवस्थेतील पंतगाची सुचना देण्याचे काम करतात.

- राजरत्न सिरसाट

अकोला : कामगंध सापळे ‘बोंडअळी’ येण्याची सूचना देत असल्याने शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीच्या नायनाटासाठी शिफारशीप्रमाणे एकात्मिक किड व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.यासाठीचे मार्गदर्शन कापूस उत्पादक जिल्ह्यातील कृषी अधिकाºयांना कृषी विद्यापीठाने केले आहे. पण अलिकडे याच उपाययोजनेवर भर दिल्या जात असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.मागीलवर्षी कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने राज्यातील ४० टक्क्यावर कपाशीचे उत्पादन घटले.याची दखल घेत यावर्षी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यातील पहिली उपाययोजना म्हणजे कपाशीच्या शेतात एकरी दोन कामगंध सापळे लावण्या शिफारस करण्यात आली. हे कामगंध सापळे (फेरोमेन ट्रॅप) बोंडअळी अगोदरच्या अवस्थेतील पंतगाची सुचना देण्याचे काम करतात. कामगंध सापळ््यात तीन दिवसात आठ ते दहा बोंडअळीचे पंतग आढळल्यास त्या भागात बोंडअळी आल्याची ही महत्वाची सुचना आहे. त्यानुसार शेतकºयांना सुरू वातील निबोंळ अर्क ५ टक्के फवारणी करावी.अळ््यांची नुकसान करण्याची पातळी वाढण्यापूर्वी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार एकात्मिक किड व्यवस्थापन करावे लागणार आहे. हेक्टरी २० कामगंध सापळे शेतात लावल्यास या सापळ््यात बोंडअळीचे पंतग अडकण्याचा दावा कृषी शास्त्रज्ञाकरवी केला जात आहे.या वषीच्या हंगामात गुलाबी बोंड अळीच्या पतंगाच्या हालचाली किंवा त्यांच्या पहिल्या पिढीची कश्या प्रकारे वाटचाल होते यासाठी जुन महिन्याच्या सुरुवातीलाच विदभार्तील अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा व यवतमाळ कापूस उत्पादक जिल्ह्यातील निवडक जिनिंग मिलमध्ये व विद्यापीठाच्या संशोधन केंद्र , कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रांवर फेरोमेन सापळे लाऊन त्यांचे टेहाळणी केली असता सर्वप्रथम जूनच्या शेवटच्या आठवड्यात हे पतंग फेरोमेन सापळ्यामध्ये आढळून आले.- कामगंध सापळ््यात पंतग जातात का?कपाशीच्या शेतात कामगंध सापळे लावल्याने त्याच्यात बोंडअळीचे पंतग अडकतातच का, हाही प्रश्न निर्माण झाला असून, यावर तर्कविर्तक सुरू आहेत.

असे करा एकात्मिक किड व्यवस्थापनजूनच्या पहिल्या पंधरवाड्यात लागवड झालेल्या कपाशीला पात्या व फुले अवस्थेत असल्यामुळे तेथे फेरोमन सापळे लावण्याव्यतिरिक्त प्रदुर्भावग्रस्त कोवळी बोंडे पात्या व डोमकळ्या नियमित शोधून त्या अळ्यासहित नष्ट कराव्या व त्वरित ५ टक्के निंबोळी अकार्ची किवा अझाडीरॅक्टीन ०.१५ टक्के २५ मिली १० लिटर पाण्यात घेउन त्वरित फवारणी करावी तर प्रादुर्भाव , लक्षणीय नुकसान असल्यास (५ ते १० टक्के फुलांचे, पात्या नुकसान) क्विनाल्फोस २५ टक्के एएफ २५ मिली किवा प्रोफेनोफोस ५० टक्के प्रवाही २० मिली १० लिटर पाण्यात घेऊन त्वरित फावारणी करावी. तसेच डोमकळ्या वेचून नष्ट करणे व फेरोमोन सापळ्यात पतंग अडकवून नष्ट करणे 'ा क्रिया नियमित सुरु ठेवाव्यात व यंदा गुलाबी बोंड अळीपासून होणारे नुकसान टाळावे असे आवाहन डॉ. विलास भाले यांनी केले आहे.- कामगंध सापळे लावणे अनिवार्यच आहे. यामुळे बोंडअळी आल्याची सुचना मिळते त्यानुसार कृषी विद्यापीठ,कृषी विभागाला शेतकºयांना मार्गदर्शन करू न एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा सल्ला दिला जातो. हेक्टरी २० सापळे लावल्यास बोंडअळीचे पंतग अडकून प्रादुर्भाक कमी होतो.डॉ. विलास खर्चे,संचालक संशोधन ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ