शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

अमरावती विभागातील शेतमजूर ‘अन्न सुरक्षा’ बाहेरच!

By admin | Updated: July 12, 2016 00:54 IST

शेतमजूरांच्या याद्या तयार आहे; शासन निर्णयाची प्रतीक्षा.

अकोला : दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्यात येत आहे. शेतकर्‍यांसोबतच शेतमजुरांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत शेतमजुरांच्या याद्या तयार करण्यात आल्या; परंतु, सवलतीच्या दरात धान्य वाटपाबाबत शासनाचा निर्णय अद्याप प्राप्त झाला नसल्याने, विभागातील शेतमजूर ह्यअन्न सुरक्षाह्ण योजनेच्या लाभापासून अद्याप बाहेरच आहेत.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होऊ नये, यासाठी राज्यातील औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली. अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दरात ३ रुपये किलो दराने तांदूळ व २ रुपये किलो दराने गहू वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २४ जुलै २0१५ रोजी घेण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांप्रमाणेच शेतमजुरांनाही राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या धर्तीवर सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्याची मागणी विचारात घेता, शेतकर्‍यांप्रमाणेच शेतमजुरांनाही सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्याचे शासनामार्फत प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार अमरावती विभागातील शेतमजुरांना अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतमजूर लाभार्थींची निवड करून याद्या तयार करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी गत १२ फेब्रुवारी रोजी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार अमरावती विभागात शेतमजुरांच्या याद्या तयार करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत करण्यात आले असले तरी, शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याचा निर्णय अद्याप शासनामार्फत घेण्यात आला नाही. तसेच यासंबंधीचा शासन आदेश पुरवठा विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेतमजूर अद्यापही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय केव्हा प्राप्त होणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.