शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अमरावती विभागातील शेतमजूर ‘अन्न सुरक्षा’ बाहेरच!

By admin | Updated: July 12, 2016 00:54 IST

शेतमजूरांच्या याद्या तयार आहे; शासन निर्णयाची प्रतीक्षा.

अकोला : दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्यात येत आहे. शेतकर्‍यांसोबतच शेतमजुरांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत शेतमजुरांच्या याद्या तयार करण्यात आल्या; परंतु, सवलतीच्या दरात धान्य वाटपाबाबत शासनाचा निर्णय अद्याप प्राप्त झाला नसल्याने, विभागातील शेतमजूर ह्यअन्न सुरक्षाह्ण योजनेच्या लाभापासून अद्याप बाहेरच आहेत.गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, राज्यातील विविध भागात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होऊ नये, यासाठी राज्यातील औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली. अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दरात ३ रुपये किलो दराने तांदूळ व २ रुपये किलो दराने गहू वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत गत २४ जुलै २0१५ रोजी घेण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांप्रमाणेच शेतमजुरांनाही राष्ट्रीय अन्न सुरक्षेच्या धर्तीवर सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्याची मागणी विचारात घेता, शेतकर्‍यांप्रमाणेच शेतमजुरांनाही सवलतीच्या दरात धान्याचा लाभ देण्याचे शासनामार्फत प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार अमरावती विभागातील शेतमजुरांना अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतमजूर लाभार्थींची निवड करून याद्या तयार करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी गत १२ फेब्रुवारी रोजी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार अमरावती विभागात शेतमजुरांच्या याद्या तयार करण्याचे काम पुरवठा विभागामार्फत करण्यात आले असले तरी, शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याचा निर्णय अद्याप शासनामार्फत घेण्यात आला नाही. तसेच यासंबंधीचा शासन आदेश पुरवठा विभागाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे शेतमजूर अद्यापही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सवलतीच्या दरातील धान्याच्या लाभापासून वंचित असल्याची स्थिती आहे. या पृष्ठभूमीवर शेतमजुरांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय केव्हा प्राप्त होणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.