शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीमुळे फुलांचा व्यवसाय पुन्हा बहरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST

अकोला : निर्बंध हटल्याने फूल व्यवसायाचे अर्थचक्र पुन्हा सुरू झाले आहे. त्यात सणासुदीचा काळ असल्याने आणखी गती मिळाली आहे. ...

अकोला : निर्बंध हटल्याने फूल व्यवसायाचे अर्थचक्र पुन्हा सुरू झाले आहे. त्यात सणासुदीचा काळ असल्याने आणखी गती मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात फूल बाजारात दररोज ३०-४० क्विंटल फुलांची उलाढाल होत होती. त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांसह विक्रेत्यांनाही दिलासा मिळाला असून, नवरात्रोत्सवातही मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फुलांचा व्यवसाय चांगलाच अडचणीत सापडला होता. सुरुवातीला चार-पाच महिने लाॅकडाऊनमध्ये फुलाला कोणी खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांनी फुले फेकून दिली होती. मध्यंतरी काही दिवस अर्थचक्राची गाडी रुळावर आल्याने फुले विक्री वाढली; परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कठोर निर्बंध लावले होते. त्यामुळे धार्मिक उत्सव, लग्न सोहळे, कार्यक्रम, मंदिरे बंद झाली. यामुळे फुलांची मागणी थांबली होती. फुलांचा व्यवसाय करणारे व्यापारी आणि फूल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले होते. परंतु आता फुलांचा व्यवसाय पुन्हा बहरू लागला आहे. सुरुवातीला श्रावण महिना, पाठोपाठ गणोशोत्सव, महालक्ष्मी उत्सवामुळे बाजारात फुलांची मागणी वाढली होती. या काळात विक्रेत्यांनीही चांगला व्यवसाय केला. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने फुलांची मागणी घटली आहे.

गणेशोत्सवातील फुलांचे दर

गुलाब १००-१५० रु. किलो

चायनीज गुलाब १००-१५० रु. बंडल

लिली १००-१५० रु. किलो

निशीगंध १००-१५० रु. किलो

गिलाडी १५०-२०० रु. किलो

जरबेरा ३० रु. बंडल

जिल्ह्यात फुलविक्रेता

११२

जिल्ह्यातील फुलक्षेत्र

१२३० हेक्टर

जालना, हिंगोलीची फुले अकोल्यात

यंदा निर्बंध नसल्याने जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती जिल्ह्यांतील फुलांचा माल अकोल्यातील बाजारात आला होता. त्यामुळे थोडा दर कमी होता. तसेच अमरावती, दर्यापूर या जिल्ह्यात अकोल्यातील फुले जात असल्याचे अडत व्यावसायिकांनी सांगितले.

कोरोनामुळे फुलांचा व्यवसाय निम्म्यापेक्षा जास्त घटला होता. आता निर्बंध हटल्याने फुलांची मागणीही वाढली आहे. फुलांना चांगला दर मिळत आहे. नवरात्रोत्सवातही फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याचा अंदाज आहे.

- नीलेश फुलारी, अडत दुकानदार

शेतकरी म्हणतात...

मागील १५ वर्षांपासून फूल शेती करीत आहे. कोरोना काळात गाडी भरून बाजारात घेऊन जाण्यासाठी परवडत नव्हते. मजुराचा खर्चही निघत नव्हता. आता निर्बंध हटल्याने फुलांची मागणी वाढली आहे.

- उमेश फुलारी, शेतकरी, पातूर

गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री केली. यामध्ये झेंडूच्या फुलांना चांगली मागणी होती. सध्या पितृपक्ष असल्याने मागणी कमी आहे. परंतु नवरात्रोत्सवात आणखी मागणी वाढणार आहे.

- विश्वनाथ इंगळे, शेतकरी, पातूर