शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सणासुदीमुळे फुलांचा व्यवसाय पुन्हा बहरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:20 IST

अकोला : निर्बंध हटल्याने फूल व्यवसायाचे अर्थचक्र पुन्हा सुरू झाले आहे. त्यात सणासुदीचा काळ असल्याने आणखी गती मिळाली आहे. ...

अकोला : निर्बंध हटल्याने फूल व्यवसायाचे अर्थचक्र पुन्हा सुरू झाले आहे. त्यात सणासुदीचा काळ असल्याने आणखी गती मिळाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात फूल बाजारात दररोज ३०-४० क्विंटल फुलांची उलाढाल होत होती. त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांसह विक्रेत्यांनाही दिलासा मिळाला असून, नवरात्रोत्सवातही मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे फुलांचा व्यवसाय चांगलाच अडचणीत सापडला होता. सुरुवातीला चार-पाच महिने लाॅकडाऊनमध्ये फुलाला कोणी खरेदीदार नसल्याने शेतकऱ्यांनी फुले फेकून दिली होती. मध्यंतरी काही दिवस अर्थचक्राची गाडी रुळावर आल्याने फुले विक्री वाढली; परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कठोर निर्बंध लावले होते. त्यामुळे धार्मिक उत्सव, लग्न सोहळे, कार्यक्रम, मंदिरे बंद झाली. यामुळे फुलांची मागणी थांबली होती. फुलांचा व्यवसाय करणारे व्यापारी आणि फूल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीत सापडले होते. परंतु आता फुलांचा व्यवसाय पुन्हा बहरू लागला आहे. सुरुवातीला श्रावण महिना, पाठोपाठ गणोशोत्सव, महालक्ष्मी उत्सवामुळे बाजारात फुलांची मागणी वाढली होती. या काळात विक्रेत्यांनीही चांगला व्यवसाय केला. सध्या पितृपक्ष सुरू असल्याने फुलांची मागणी घटली आहे.

गणेशोत्सवातील फुलांचे दर

गुलाब १००-१५० रु. किलो

चायनीज गुलाब १००-१५० रु. बंडल

लिली १००-१५० रु. किलो

निशीगंध १००-१५० रु. किलो

गिलाडी १५०-२०० रु. किलो

जरबेरा ३० रु. बंडल

जिल्ह्यात फुलविक्रेता

११२

जिल्ह्यातील फुलक्षेत्र

१२३० हेक्टर

जालना, हिंगोलीची फुले अकोल्यात

यंदा निर्बंध नसल्याने जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती जिल्ह्यांतील फुलांचा माल अकोल्यातील बाजारात आला होता. त्यामुळे थोडा दर कमी होता. तसेच अमरावती, दर्यापूर या जिल्ह्यात अकोल्यातील फुले जात असल्याचे अडत व्यावसायिकांनी सांगितले.

कोरोनामुळे फुलांचा व्यवसाय निम्म्यापेक्षा जास्त घटला होता. आता निर्बंध हटल्याने फुलांची मागणीही वाढली आहे. फुलांना चांगला दर मिळत आहे. नवरात्रोत्सवातही फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याचा अंदाज आहे.

- नीलेश फुलारी, अडत दुकानदार

शेतकरी म्हणतात...

मागील १५ वर्षांपासून फूल शेती करीत आहे. कोरोना काळात गाडी भरून बाजारात घेऊन जाण्यासाठी परवडत नव्हते. मजुराचा खर्चही निघत नव्हता. आता निर्बंध हटल्याने फुलांची मागणी वाढली आहे.

- उमेश फुलारी, शेतकरी, पातूर

गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री केली. यामध्ये झेंडूच्या फुलांना चांगली मागणी होती. सध्या पितृपक्ष असल्याने मागणी कमी आहे. परंतु नवरात्रोत्सवात आणखी मागणी वाढणार आहे.

- विश्वनाथ इंगळे, शेतकरी, पातूर