शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अकरा वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्यात ‘मे’चा ताप कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST

पर्यावरणातील बदल या तापमानातील चढ-उताराला कारणीभूत ठरत आहे. २०१० च्या मे महिन्यातील दुसरा आठवडा व यंदाच्या मे महिन्यातील तापमानाची ...

पर्यावरणातील बदल या तापमानातील चढ-उताराला कारणीभूत ठरत आहे. २०१० च्या मे महिन्यातील दुसरा आठवडा व यंदाच्या मे महिन्यातील तापमानाची तुलना केली असता अकरा वर्षांतील सर्वात कमी तापमान यंदाच्या मे महिन्यात असल्याचे दिसून आले. निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. त्यामुळे हवामान बदलत आहे. पावसाचे वेळापत्रक, हिवाळ्यातील थंडी व उन्हाळ्यातील तापमानात सुसूत्रता राहिलेली नाही. मे २०१० मध्ये ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती व हे तापमान महिनाभर कायम होते. मात्र, यंदा अजूनही तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले नाही, तर मागील वर्षी दहा वर्षांतील सर्वाधिक ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

अकोल्यातील गरमीचे अनेक रेकॉर्ड

राज्यातच नव्हे तर देशात सर्वात गरम शहर म्हणून अकोल्याची ओळख आहे. उन्हाळ्यात अकोला जिल्ह्याचे तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पार पोहोचते. बहुतांश वेळेस जिल्ह्याचे तापमान राज्यात सर्वाधिक आढळते. त्यामुळे मागील अकरा वर्षांत जिल्ह्यात तापमानाचे अनेक रेकॉर्ड नोंदविले आहेत.

अकरा वर्षांतील तापमानाची नोंद

तारीख/वर्ष अंश सेल्सिअस

१८/२०११ ४५.१

२१/२०१२ ४४.८

२१/२०१३ ४६.३

२५/२०१४ ४४.२

२०/२०१५ ४६.४

१९/२०१६ ४७.१

२६/२०१७ ४५.७

२९/२०१८ ४५.१

३१/२०१९ ४५.८

२६/२०२० ४७.४

०५/२०२१ ४३.४