शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

दशकभरात पहिल्यांदाच पावसाळा वेळेवर!

By admin | Updated: June 24, 2015 01:35 IST

४८ तासातच सरासरीच्या अर्धा पाऊस; खंड पडण्याची शक्यता.

राजरत्न सिरसाट/अकोला: दशकभरात यावर्षी प्रथमच वेळेवर पावसाळा सुरू झाला असून, जून महिन्यातच अनेक ठिकाणी दीडपट पाऊस पडला आहे; पण पावसाचे स्वरू प असमान आहे. संपूर्ण पावसाळ्य़ात सरासरी जेवढा पाऊस पडतो, त्याच्या अर्धा पाऊस ४८ तासात पडण्याचे प्रमाण वाढल्याने पुढील महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १0 ते १२ जून रोजी पावसाने सुरुवात केली असून, राज्यात जून महिन्यामध्ये सरासरी २२३. ३ मिमी पाऊस झाला आहे. १९ जूनपर्यंत हा पाऊस १0६. ३ मिमी झाला आहे. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या ४६.६ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जिल्हानिहाय पर्जन्यमानाची आकडेवारी बघितल्यास १९ जूनपर्यंत कोल्हापूर जिल्हय़ात २५ टक्के पाऊस झाला असून, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नाशिक, पुणे, सातारा उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा, गोंदिया व चंद्रपूर या १२ जिल्हय़ात २५ ते ५0 टक्के पाऊस झाला आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव,अहमदनगर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा व गडचिरोली या १७ जिल्हय़ात ५0 ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जालना, हिंगोली व वाशिम या तीन जिल्हय़ात ७५ ते १00 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हय़ात १00 टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला जिल्हय़ात दीडपट पाऊस झाला आहे; पण याच जिल्हय़ातील शेतकर्‍यांना अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी शेतकर्‍यांची पेरणी खोळंबली आहे. अमरावती जिल्हय़ात २८५ मिमी पाऊस झाल्याने पेरणीसाठी शेतीला वाफसा येण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. राज्यात पावसाचे असे विषम स्वरू प आहे. काही ठिकाणी अतिवेगाने तर काही ठिकाणी रिमझिम पडणार्‍या या पावसामागे हवामान बदल कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.