शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

दशकभरात पहिल्यांदाच पावसाळा वेळेवर!

By admin | Updated: June 24, 2015 01:35 IST

४८ तासातच सरासरीच्या अर्धा पाऊस; खंड पडण्याची शक्यता.

राजरत्न सिरसाट/अकोला: दशकभरात यावर्षी प्रथमच वेळेवर पावसाळा सुरू झाला असून, जून महिन्यातच अनेक ठिकाणी दीडपट पाऊस पडला आहे; पण पावसाचे स्वरू प असमान आहे. संपूर्ण पावसाळ्य़ात सरासरी जेवढा पाऊस पडतो, त्याच्या अर्धा पाऊस ४८ तासात पडण्याचे प्रमाण वाढल्याने पुढील महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १0 ते १२ जून रोजी पावसाने सुरुवात केली असून, राज्यात जून महिन्यामध्ये सरासरी २२३. ३ मिमी पाऊस झाला आहे. १९ जूनपर्यंत हा पाऊस १0६. ३ मिमी झाला आहे. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या ४६.६ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जिल्हानिहाय पर्जन्यमानाची आकडेवारी बघितल्यास १९ जूनपर्यंत कोल्हापूर जिल्हय़ात २५ टक्के पाऊस झाला असून, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नाशिक, पुणे, सातारा उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा, गोंदिया व चंद्रपूर या १२ जिल्हय़ात २५ ते ५0 टक्के पाऊस झाला आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव,अहमदनगर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा व गडचिरोली या १७ जिल्हय़ात ५0 ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जालना, हिंगोली व वाशिम या तीन जिल्हय़ात ७५ ते १00 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हय़ात १00 टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला जिल्हय़ात दीडपट पाऊस झाला आहे; पण याच जिल्हय़ातील शेतकर्‍यांना अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी शेतकर्‍यांची पेरणी खोळंबली आहे. अमरावती जिल्हय़ात २८५ मिमी पाऊस झाल्याने पेरणीसाठी शेतीला वाफसा येण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. राज्यात पावसाचे असे विषम स्वरू प आहे. काही ठिकाणी अतिवेगाने तर काही ठिकाणी रिमझिम पडणार्‍या या पावसामागे हवामान बदल कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.