शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दशकभरात पहिल्यांदाच पावसाळा वेळेवर!

By admin | Updated: June 24, 2015 01:35 IST

४८ तासातच सरासरीच्या अर्धा पाऊस; खंड पडण्याची शक्यता.

राजरत्न सिरसाट/अकोला: दशकभरात यावर्षी प्रथमच वेळेवर पावसाळा सुरू झाला असून, जून महिन्यातच अनेक ठिकाणी दीडपट पाऊस पडला आहे; पण पावसाचे स्वरू प असमान आहे. संपूर्ण पावसाळ्य़ात सरासरी जेवढा पाऊस पडतो, त्याच्या अर्धा पाऊस ४८ तासात पडण्याचे प्रमाण वाढल्याने पुढील महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १0 ते १२ जून रोजी पावसाने सुरुवात केली असून, राज्यात जून महिन्यामध्ये सरासरी २२३. ३ मिमी पाऊस झाला आहे. १९ जूनपर्यंत हा पाऊस १0६. ३ मिमी झाला आहे. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या ४६.६ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जिल्हानिहाय पर्जन्यमानाची आकडेवारी बघितल्यास १९ जूनपर्यंत कोल्हापूर जिल्हय़ात २५ टक्के पाऊस झाला असून, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नाशिक, पुणे, सातारा उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा, गोंदिया व चंद्रपूर या १२ जिल्हय़ात २५ ते ५0 टक्के पाऊस झाला आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव,अहमदनगर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा व गडचिरोली या १७ जिल्हय़ात ५0 ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जालना, हिंगोली व वाशिम या तीन जिल्हय़ात ७५ ते १00 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हय़ात १00 टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला जिल्हय़ात दीडपट पाऊस झाला आहे; पण याच जिल्हय़ातील शेतकर्‍यांना अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी शेतकर्‍यांची पेरणी खोळंबली आहे. अमरावती जिल्हय़ात २८५ मिमी पाऊस झाल्याने पेरणीसाठी शेतीला वाफसा येण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. राज्यात पावसाचे असे विषम स्वरू प आहे. काही ठिकाणी अतिवेगाने तर काही ठिकाणी रिमझिम पडणार्‍या या पावसामागे हवामान बदल कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.