शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पोळ्याचा हा सण, फेडू वृषभाचे ऋण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:43 IST

अकोलो : सर्जनशील मातीचे प्राण असतात बैल, शेतकर्‍यांच्या दाराची शान असतात बैल, अंगी त्यांच्या भिनलेली, श्रम आणि सोशिकता, मालकाच्या व्यथेचेही कान असतात बैल. शेतकर्‍यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा हा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत आहे. कृषी व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणार्‍या या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

ठळक मुद्देशेतीत राबणार्‍या मुक्या जीवांचा आज गौरव सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोलो : सर्जनशील मातीचे प्राण असतात बैल, शेतकर्‍यांच्या दाराची शान असतात बैल, अंगी त्यांच्या भिनलेली, श्रम आणि सोशिकता, मालकाच्या व्यथेचेही कान असतात बैल. शेतकर्‍यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा हा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत आहे. कृषी व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणार्‍या या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.अस्मानी, सुल्तानी संकटांनी विदारक स्थितीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या वेदनेचे भागीदार व त्याच्या वाताहतीचे मूक साक्षीदार असतात ते फक्त बैलच! शेतकर्‍याच्या सोबतीने दिवसभर उन्हा-तान्हात राबताना बैल कधीच काम जास्त झाल्याची तक्रार करीत नाहीत. जीवात जीव असेपर्यंत नांगर, वखर ओढायचा व आपल्या पोशिंद्याच्या संसाराला हातभार लावायचा एवढेच त्यांना कळते. कधी वैरण कमी झाली म्हणून बैल काम टाळण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मालकाच्या फाटक्या संसाराला थिगळे लावण्यासाठी आपले कातडे सोलून द्यायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत एवढी कृतज्ञतेची भावना या मुक्या जीवांच्या मनात असली पाहिजे. मालक पाठीवरुन प्रेमाने हात फिरवितो तेव्हा आपले जीवन धन्य झाल्यासारखे त्याला वाटते. हिरवेगार डुलणारे शिवार पाहून धन्यासोबतच त्याची सर्जा-राजाची जोडीही प्रसन्न होते व प्रफुल्लीत मनाने तुरु-तुरु चालायला लागते. मात्र बाजारात माल बेभाव विकून आल्यानंतर परतीच्या वाटेवर त्यांचीही पावले जणू जड होतात. शेतकर्‍याच्या जीवनाशी एकरुप झालेल्या या वृषभराजाची थोरवी आपल्या पूर्वजांनी जाणली व त्यातूनच ‘पोळा’ सण साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. कित्येक वर्षापूर्वीपासून सुरु झालेली पोळा साजरा करण्याची ही परंपरा आजतागायत सुरु असली तरी त्यात मोठा बदल आता झाला आहे. एकतर बैलांची संख्याच आता झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे आता अनेकांना केवळ मातीचे बैल, पुजूनच समाधान मानावे लागते. यांत्रिकीकरणाने प्रथम बैलांचाच बळी घेतला, ट्रॅक्टर, मळणीयंत्र आल्याने अनेक कामे बैलांशिवाय होवू लागली. त्यामुळे बैलांची शेतीकामात गरज उरली नाही. कृतघ्न माणसाने बैल खाटकाच्या दावणीला बांधले. अन् यातच शेतकर्‍याचा घात झाला. गोवंश नष्ट होवू लागल्याने शेतीत अनेक समस्या निर्माण झाल्या. रासायनिक खते, किटकनाशकांनी जमिनी नासवल्या. एका वेगळ्याच दुष्टचक्रात शेतकरी अडकला आणि बैलांचा कासरा गळफास म्हणून उपयोगी आला.