शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याचा हा सण, फेडू वृषभाचे ऋण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:43 IST

अकोलो : सर्जनशील मातीचे प्राण असतात बैल, शेतकर्‍यांच्या दाराची शान असतात बैल, अंगी त्यांच्या भिनलेली, श्रम आणि सोशिकता, मालकाच्या व्यथेचेही कान असतात बैल. शेतकर्‍यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा हा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत आहे. कृषी व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणार्‍या या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

ठळक मुद्देशेतीत राबणार्‍या मुक्या जीवांचा आज गौरव सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोलो : सर्जनशील मातीचे प्राण असतात बैल, शेतकर्‍यांच्या दाराची शान असतात बैल, अंगी त्यांच्या भिनलेली, श्रम आणि सोशिकता, मालकाच्या व्यथेचेही कान असतात बैल. शेतकर्‍यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा हा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत आहे. कृषी व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणार्‍या या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.अस्मानी, सुल्तानी संकटांनी विदारक स्थितीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या वेदनेचे भागीदार व त्याच्या वाताहतीचे मूक साक्षीदार असतात ते फक्त बैलच! शेतकर्‍याच्या सोबतीने दिवसभर उन्हा-तान्हात राबताना बैल कधीच काम जास्त झाल्याची तक्रार करीत नाहीत. जीवात जीव असेपर्यंत नांगर, वखर ओढायचा व आपल्या पोशिंद्याच्या संसाराला हातभार लावायचा एवढेच त्यांना कळते. कधी वैरण कमी झाली म्हणून बैल काम टाळण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मालकाच्या फाटक्या संसाराला थिगळे लावण्यासाठी आपले कातडे सोलून द्यायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत एवढी कृतज्ञतेची भावना या मुक्या जीवांच्या मनात असली पाहिजे. मालक पाठीवरुन प्रेमाने हात फिरवितो तेव्हा आपले जीवन धन्य झाल्यासारखे त्याला वाटते. हिरवेगार डुलणारे शिवार पाहून धन्यासोबतच त्याची सर्जा-राजाची जोडीही प्रसन्न होते व प्रफुल्लीत मनाने तुरु-तुरु चालायला लागते. मात्र बाजारात माल बेभाव विकून आल्यानंतर परतीच्या वाटेवर त्यांचीही पावले जणू जड होतात. शेतकर्‍याच्या जीवनाशी एकरुप झालेल्या या वृषभराजाची थोरवी आपल्या पूर्वजांनी जाणली व त्यातूनच ‘पोळा’ सण साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. कित्येक वर्षापूर्वीपासून सुरु झालेली पोळा साजरा करण्याची ही परंपरा आजतागायत सुरु असली तरी त्यात मोठा बदल आता झाला आहे. एकतर बैलांची संख्याच आता झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे आता अनेकांना केवळ मातीचे बैल, पुजूनच समाधान मानावे लागते. यांत्रिकीकरणाने प्रथम बैलांचाच बळी घेतला, ट्रॅक्टर, मळणीयंत्र आल्याने अनेक कामे बैलांशिवाय होवू लागली. त्यामुळे बैलांची शेतीकामात गरज उरली नाही. कृतघ्न माणसाने बैल खाटकाच्या दावणीला बांधले. अन् यातच शेतकर्‍याचा घात झाला. गोवंश नष्ट होवू लागल्याने शेतीत अनेक समस्या निर्माण झाल्या. रासायनिक खते, किटकनाशकांनी जमिनी नासवल्या. एका वेगळ्याच दुष्टचक्रात शेतकरी अडकला आणि बैलांचा कासरा गळफास म्हणून उपयोगी आला.