शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

पोळ्याचा हा सण, फेडू वृषभाचे ऋण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:43 IST

अकोलो : सर्जनशील मातीचे प्राण असतात बैल, शेतकर्‍यांच्या दाराची शान असतात बैल, अंगी त्यांच्या भिनलेली, श्रम आणि सोशिकता, मालकाच्या व्यथेचेही कान असतात बैल. शेतकर्‍यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा हा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत आहे. कृषी व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणार्‍या या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

ठळक मुद्देशेतीत राबणार्‍या मुक्या जीवांचा आज गौरव सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोलो : सर्जनशील मातीचे प्राण असतात बैल, शेतकर्‍यांच्या दाराची शान असतात बैल, अंगी त्यांच्या भिनलेली, श्रम आणि सोशिकता, मालकाच्या व्यथेचेही कान असतात बैल. शेतकर्‍यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा हा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत आहे. कृषी व्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणार्‍या या वृषभराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.अस्मानी, सुल्तानी संकटांनी विदारक स्थितीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या वेदनेचे भागीदार व त्याच्या वाताहतीचे मूक साक्षीदार असतात ते फक्त बैलच! शेतकर्‍याच्या सोबतीने दिवसभर उन्हा-तान्हात राबताना बैल कधीच काम जास्त झाल्याची तक्रार करीत नाहीत. जीवात जीव असेपर्यंत नांगर, वखर ओढायचा व आपल्या पोशिंद्याच्या संसाराला हातभार लावायचा एवढेच त्यांना कळते. कधी वैरण कमी झाली म्हणून बैल काम टाळण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मालकाच्या फाटक्या संसाराला थिगळे लावण्यासाठी आपले कातडे सोलून द्यायलाही ते मागे पुढे पाहणार नाहीत एवढी कृतज्ञतेची भावना या मुक्या जीवांच्या मनात असली पाहिजे. मालक पाठीवरुन प्रेमाने हात फिरवितो तेव्हा आपले जीवन धन्य झाल्यासारखे त्याला वाटते. हिरवेगार डुलणारे शिवार पाहून धन्यासोबतच त्याची सर्जा-राजाची जोडीही प्रसन्न होते व प्रफुल्लीत मनाने तुरु-तुरु चालायला लागते. मात्र बाजारात माल बेभाव विकून आल्यानंतर परतीच्या वाटेवर त्यांचीही पावले जणू जड होतात. शेतकर्‍याच्या जीवनाशी एकरुप झालेल्या या वृषभराजाची थोरवी आपल्या पूर्वजांनी जाणली व त्यातूनच ‘पोळा’ सण साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. कित्येक वर्षापूर्वीपासून सुरु झालेली पोळा साजरा करण्याची ही परंपरा आजतागायत सुरु असली तरी त्यात मोठा बदल आता झाला आहे. एकतर बैलांची संख्याच आता झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे आता अनेकांना केवळ मातीचे बैल, पुजूनच समाधान मानावे लागते. यांत्रिकीकरणाने प्रथम बैलांचाच बळी घेतला, ट्रॅक्टर, मळणीयंत्र आल्याने अनेक कामे बैलांशिवाय होवू लागली. त्यामुळे बैलांची शेतीकामात गरज उरली नाही. कृतघ्न माणसाने बैल खाटकाच्या दावणीला बांधले. अन् यातच शेतकर्‍याचा घात झाला. गोवंश नष्ट होवू लागल्याने शेतीत अनेक समस्या निर्माण झाल्या. रासायनिक खते, किटकनाशकांनी जमिनी नासवल्या. एका वेगळ्याच दुष्टचक्रात शेतकरी अडकला आणि बैलांचा कासरा गळफास म्हणून उपयोगी आला.