शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीशिवाय औषध विकणेे भाेवले; विकतात अनेकजण, सापडले केवळ ३२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:23 IST

सचिन राऊत अकाेला : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन न करता मनमर्जीने औषधी विकणे जिल्ह्यातील ३२ औषधी ...

सचिन राऊत

अकाेला : शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन न करता मनमर्जीने औषधी विकणे जिल्ह्यातील ३२ औषधी दुकानदारांना चांगलेच भोवले आहे. कारण, एप्रिल ते जुलै या महिन्यांच्या काळात जिल्ह्यातील ३२ औषधी विक्री करणाऱ्या दुकानदारांना कारणे दाखवा नाेटीस बजाविण्यात आल्या असून, यापैकी २२ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, १० मेडिकलचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

अकाेला जिल्ह्यातील सात तालुक्यांत ७८० पेक्षा अधिक औषधी दुकानदार असून, या दुकानांची वारंवार तपासणी करण्यात येते़. मागील काही महिन्यांत अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या पडताळणीत तब्बल ३२ मेडिकल्समध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. या मेडिकल संचालकांना याबाबत खुलासाही मागविण्यात आला होता. मात्र, खुलाशाला साजेसे उत्तर न मिळाल्याने अखेर अन्न व औषध प्रशासनाने या औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित केले असल्याची माहिती आहे. पुढील काळातही या औषधी विक्री केंद्रांवर विशेष लक्ष असून, त्यामध्येही त्रुटी आढळल्यास त्या संचालकांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यामुळे झाले परवाने निलंबित

अन्न व औषध विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ३२ औषधी दुकानदारांना परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटींचे पालन न करणे, स्टाॅकची उपलब्धता किती आहे याचे विवरण नसणे, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड नसणे, डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी विकणे यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यातील २२ औषधी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आहे.

जिल्हयातील १० मेडिकलचे परवाने रद्द

जिल्हयातील अकाेला शहरासह तालुक्याच्या ठिकाणांवर असलेल्या १० मेडिकलचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या मेडिकलच्या संचालकांकडे औषधी खरेदी-विक्रीचे बिलच नसणे, रेकाॅर्ड व्यवस्थित न ठेवणे, डाॅक्टरांची चिठ्ठी नसणे यासह विविध कारणे आहेत. रेकॉर्डही समाधानकारक नसल्याने या मेडिकलचे परवाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच औषधी विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांना अनेक जण बगल देताना दिसतात. अशांवर अन्न व औषध विभागाचा वॉच असून, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३२ औषधी दुकानदारांना नाेटीस बजावून यापैकी २२ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, दहाजणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

- व्ही. बी. सुलाेचने, सहायक आयुक्त, औषधी विभाग, अकाेला

अशी झाली कारवाई

वर्ष परवाने निलंबित परवाने रद्द

२०२० २८ १२

२०२१ २२ १०

काेराेना काळात सर्दी, अंगदुखीसाठी डाॅक्टरकडे काेण जाणार

काेराेना काळात काेराेनाच्या भीतीमुळे कुणीही डाॅक्टरकडे जाण्यास घाबरत हाेते. त्यामुळे या काळात ओळखीच्या मेडिकलमधून औषधी घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक हाेते. सर्दी, ताप व अंगदुखीसाठी कुणीही डाॅक्टरकडे गेले नसल्याचे वास्तव आहे. या काळात प्रत्येकाने किरकाेळ दुखणे अंगावर काढत औषधी दुकानदारांकडूनच औषधी खरेदी केल्याची माहीती आहे.