शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबविणार प्रबोधनात्मक उपक्रम!

By admin | Updated: January 5, 2016 01:54 IST

माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांची माहिती.

अकोला: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध विभागांमार्फत योजना राबविल्या जात आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाने देखील हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष पावले उचलण्याचे ठरविले असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी ग्रामीण भागात प्रबोधनात्मक उपक्रम राबविणार असल्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी सोमवारी दुपारी जिल्हा माहिती कार्यालयात पार पडलेल्या पत्रपरिषदेत दिली. दुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचा विचार करणार्‍या शेतकर्‍यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे मोठी भूमिका बजावू शकतात. शासनाच्या विविध योजना व निर्णय शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी कसोशीने प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. या प्रयत्नांना यशाची जोड देण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने नवोपक्रम हाती घेतला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने येत्या फेब्रुवारी महिन्यापासून जिल्हय़ातील ग्रामीण भागात प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जाणार आहेत. शेतकर्‍यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी कीर्तन, भारूड, पथनाट्ये, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची व्याख्याने व चित्ररथाच्या माध्यमातून माहितीपट दाखविणे असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत भुजबळ यांनी दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्याही जाणून घेतल्या. पत्रपरिषदेला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ शर्मा, शौकतअली मिरसाहेब, सुधाकर खुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.