शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबविणार प्रबोधनात्मक उपक्रम!

By admin | Updated: January 5, 2016 01:54 IST

माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांची माहिती.

अकोला: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध विभागांमार्फत योजना राबविल्या जात आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाने देखील हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष पावले उचलण्याचे ठरविले असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी ग्रामीण भागात प्रबोधनात्मक उपक्रम राबविणार असल्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी सोमवारी दुपारी जिल्हा माहिती कार्यालयात पार पडलेल्या पत्रपरिषदेत दिली. दुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचा विचार करणार्‍या शेतकर्‍यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे मोठी भूमिका बजावू शकतात. शासनाच्या विविध योजना व निर्णय शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी कसोशीने प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. या प्रयत्नांना यशाची जोड देण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने नवोपक्रम हाती घेतला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने येत्या फेब्रुवारी महिन्यापासून जिल्हय़ातील ग्रामीण भागात प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जाणार आहेत. शेतकर्‍यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी कीर्तन, भारूड, पथनाट्ये, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची व्याख्याने व चित्ररथाच्या माध्यमातून माहितीपट दाखविणे असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत भुजबळ यांनी दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्याही जाणून घेतल्या. पत्रपरिषदेला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ शर्मा, शौकतअली मिरसाहेब, सुधाकर खुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.