शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
5
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
6
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
7
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
8
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
9
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
10
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
11
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
12
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
13
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
15
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
16
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
17
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
18
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
19
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
20
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राबविणार प्रबोधनात्मक उपक्रम!

By admin | Updated: January 5, 2016 01:54 IST

माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांची माहिती.

अकोला: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध विभागांमार्फत योजना राबविल्या जात आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाने देखील हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष पावले उचलण्याचे ठरविले असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापासून शेतकर्‍यांना आत्महत्यांपासून प्रवृत्त करण्यासाठी ग्रामीण भागात प्रबोधनात्मक उपक्रम राबविणार असल्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी सोमवारी दुपारी जिल्हा माहिती कार्यालयात पार पडलेल्या पत्रपरिषदेत दिली. दुष्काळी स्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येचा विचार करणार्‍या शेतकर्‍यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे मोठी भूमिका बजावू शकतात. शासनाच्या विविध योजना व निर्णय शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र व प्रसारमाध्यमांनी कसोशीने प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. या प्रयत्नांना यशाची जोड देण्यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाने नवोपक्रम हाती घेतला आहे. शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने येत्या फेब्रुवारी महिन्यापासून जिल्हय़ातील ग्रामीण भागात प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जाणार आहेत. शेतकर्‍यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी कीर्तन, भारूड, पथनाट्ये, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची व्याख्याने व चित्ररथाच्या माध्यमातून माहितीपट दाखविणे असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत भुजबळ यांनी दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्याही जाणून घेतल्या. पत्रपरिषदेला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ शर्मा, शौकतअली मिरसाहेब, सुधाकर खुमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.