शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

वरुड बिहाडे येथील शेतमजूर विजेच्या धक्कय़ाने ठार

By admin | Updated: July 9, 2016 01:01 IST

विद्युत खांबाच्या ताणाचा लागला शॉक

तेल्हारा : शेतातीलच विजेच्या खांबाच्या ताणाला स्पर्श होऊन विजेचा जोरदार धक्का लागल्याने तालुक्यातील वरुड बिहाडे येथील २२ वर्षी शेतमजूर ठार झाला. तालुक्यातील वरूड बिहाडे येथील मनोहर बिहाडे यांच्या शेतात अक्षय अर्जुन खोडके हा २२ वर्षीय युवक ८ जुलै रोजी मोलमजुरीच्या कामाकरिता गेला होता. शेतातील महिलांना पाणी पाजण्याचे मजुरीचे काम आटोपून तो चप्पल घालत असताना त्याने शेतातीलच विजेच्या खांबाच्या ताणाला आधार म्हणून पकडले. त्या विजेच्या खांबाच्या ताणात विद्युत प्रवाह आलेला असल्याने सदर युवकास विजेचा जोरदार धक्का लागून गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी त्यास उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सदर युवक हा भूमिहीन शेतमजूर असून, त्याची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.इन्सुलेटर असताना तारेत विद्युत प्रवाह कसा?विद्युत खांबाला आधार म्हणून ताण लावलेला असतो. सदर ताण खांबाच्या स्ट्रपपासून जमिनीकडे असतो. सदर ताणाच्या मध्यभागी चिनीमातीचे इन्सुलेटर बसविलेले असते. त्यामुळे ताणात विद्युत प्रवाह आल्यास तो मध्येच खंडित होतो व जमिनीपर्यंत पोहोचत नाही. असे असताना ताणात विद्युत प्रवाह आलाच कसा, हा प्रश्न निर्माण होत असून, देखभाल दुरुस्ती कागदोपत्री होत असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे.