शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पीक विमा काढण्याकडे शेतक-यांचा कल वाढला !

By admin | Updated: July 24, 2015 00:57 IST

३१ जुलै शेवटचा दिवस; व-हाडातील शेतकर्‍यांना मिळाले गतवर्षीचे २७९ कोटी; १४२ कोटीची प्रतीक्षा.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी आतापर्यंत ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; परंतु पावसाची अनियमितता बघता शेतकर्‍यांनी पीक विमा काढण्यावर जोर दिला आहे. पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलैपर्यंतच असल्याने बँकांमध्ये गर्दी वाढली आहे. दरम्यान, पीक विम्यापोटी आलेले मागील वर्षाचे १४२.२ कोटी शेतकर्‍यांना अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.यंदा पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांना पीक विम्याची ४२१ कोटी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. यात हवामानावर आधारित पीक विम्याचे ७६.४0 कोटी मिळाले आहेत; पण रक्कम मिळण्यास होणार्‍या दिरंगाईमुळे आतापर्यंत केवळ २७९.0६ कोटी रूपये नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळाली असून, १४२.0२ कोटी रुपये मिळण्यासाठी शेतकर्‍यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. या पाचही जिल्हय़ांमध्ये आतापर्यंत सरासरी २३३ मि.मी. एवढाच पाऊस झाल्याने पुढे पाऊस येईल की नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. असे असले तरी वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे. २१ जुलैपर्यंत पश्‍चिम विदर्भातील २७ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचा पीक विमा काढण्याकडे कल वाढला आहे. *४२१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील शेतकर्‍यांना मागील वर्षाचे ४२१ कोटी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. यात अकोला जिल्हय़ाला १0९ कोटी २७ लाख रुपये मिळाले आहेत. बुलडाणा जिल्हय़ाला ९१ कोटी, वाशिम ५७ कोटी ९९ लाख, यवतमाळ ७८ कोटी ९0 लाख, तर अमरावती जिल्हय़ाला ८३ कोटी ४५ लाख रुपये नुकतेच मिळाले आहेत; पण यातील १४२.२ कोटी रुपये थकले आहेत.