शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढण्याकडे शेतक-यांचा कल वाढला !

By admin | Updated: July 24, 2015 00:57 IST

३१ जुलै शेवटचा दिवस; व-हाडातील शेतकर्‍यांना मिळाले गतवर्षीचे २७९ कोटी; १४२ कोटीची प्रतीक्षा.

अकोला : पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील शेतकर्‍यांनी आतापर्यंत ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; परंतु पावसाची अनियमितता बघता शेतकर्‍यांनी पीक विमा काढण्यावर जोर दिला आहे. पीक विमा काढण्याची मुदत ३१ जुलैपर्यंतच असल्याने बँकांमध्ये गर्दी वाढली आहे. दरम्यान, पीक विम्यापोटी आलेले मागील वर्षाचे १४२.२ कोटी शेतकर्‍यांना अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत.यंदा पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांना पीक विम्याची ४२१ कोटी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. यात हवामानावर आधारित पीक विम्याचे ७६.४0 कोटी मिळाले आहेत; पण रक्कम मिळण्यास होणार्‍या दिरंगाईमुळे आतापर्यंत केवळ २७९.0६ कोटी रूपये नुकसान भरपाई शेतकर्‍यांना मिळाली असून, १४२.0२ कोटी रुपये मिळण्यासाठी शेतकर्‍यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. या पाचही जिल्हय़ांमध्ये आतापर्यंत सरासरी २३३ मि.मी. एवढाच पाऊस झाल्याने पुढे पाऊस येईल की नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. असे असले तरी वर्‍हाडातील शेतकर्‍यांनी ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे. २१ जुलैपर्यंत पश्‍चिम विदर्भातील २७ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचा पीक विमा काढण्याकडे कल वाढला आहे. *४२१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ातील शेतकर्‍यांना मागील वर्षाचे ४२१ कोटी ९ लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. यात अकोला जिल्हय़ाला १0९ कोटी २७ लाख रुपये मिळाले आहेत. बुलडाणा जिल्हय़ाला ९१ कोटी, वाशिम ५७ कोटी ९९ लाख, यवतमाळ ७८ कोटी ९0 लाख, तर अमरावती जिल्हय़ाला ८३ कोटी ४५ लाख रुपये नुकतेच मिळाले आहेत; पण यातील १४२.२ कोटी रुपये थकले आहेत.