शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी सरसावले

By admin | Updated: November 2, 2015 02:55 IST

शुक्रवारी देणार ठिय्या; जिल्हाभरातील शेतकरी होणार सहभागी.

अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांंपासून जेरीस आला आहे. यावर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके हातची गेली, तर सोयाबीन, कपाशी व तुरीचे उत्पादन घटले आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे रब्बी हंगामाचीही शक्यता धूसर आहे. शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकरी जागर मंच शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देणार आहेत यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उधार-उसनवारी व कर्ज घेऊन पेरणी केली; परंतु अपेक्षेनुसार उत्पादन झाले नाही. मूग, उडिदाची पिकं गेली. सोयाबीनचा उताराही एकरी तीन ते चार क्विंटल एवढा येत आहे. यातून पेरणीसाठी झालेला खर्चही वसूल झालेला नाही. परिस्थिती एवढी भीषण असतानाही शासनाने जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक जाहीर केली. अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी पिचून गेले आहेत. अनेक शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असताना शासनाचे त्याकडे फारसे लक्ष नाही. दिवाळीसारखा सण तोंडावर आला असताना पैसा नसल्यामुळे शेतकर्‍यांनी बाजारपेठेकडे पाहिलेदेखील नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन जागर मंचने जिल्हाधिकार्‍यांना २७ ऑक्टोबर रोजी दिले होते. याच मागणीच्या अनुषंगाने शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देणार आहेत. या आंदोलनात मनोज तायडे, गजानन फुंडकर, दिनकरराव वाघ, प्रशांत नागे, ज्ञानेश्‍वर गावंडे, गोपाळराव काठोळे, बाळासाहेब वसू, शेख गणी, शरद देशमुख यांच्यासह कौलखेड, विराहित, म्हैसांग, रामगाव, अन्वी मिर्झापूर, पळसो, सुकळी, सांगळूद, डोंगरगाव मासा, बोरगाव मंजू, आपातापा येथील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.