शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी सरसावले

By admin | Updated: November 2, 2015 02:55 IST

शुक्रवारी देणार ठिय्या; जिल्हाभरातील शेतकरी होणार सहभागी.

अकोला: निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी गत तीन वर्षांंपासून जेरीस आला आहे. यावर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके हातची गेली, तर सोयाबीन, कपाशी व तुरीचे उत्पादन घटले आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे रब्बी हंगामाचीही शक्यता धूसर आहे. शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकरी जागर मंच शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देणार आहेत यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उधार-उसनवारी व कर्ज घेऊन पेरणी केली; परंतु अपेक्षेनुसार उत्पादन झाले नाही. मूग, उडिदाची पिकं गेली. सोयाबीनचा उताराही एकरी तीन ते चार क्विंटल एवढा येत आहे. यातून पेरणीसाठी झालेला खर्चही वसूल झालेला नाही. परिस्थिती एवढी भीषण असतानाही शासनाने जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा अधिक जाहीर केली. अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी पिचून गेले आहेत. अनेक शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असताना शासनाचे त्याकडे फारसे लक्ष नाही. दिवाळीसारखा सण तोंडावर आला असताना पैसा नसल्यामुळे शेतकर्‍यांनी बाजारपेठेकडे पाहिलेदेखील नाही. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन जागर मंचने जिल्हाधिकार्‍यांना २७ ऑक्टोबर रोजी दिले होते. याच मागणीच्या अनुषंगाने शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देणार आहेत. या आंदोलनात मनोज तायडे, गजानन फुंडकर, दिनकरराव वाघ, प्रशांत नागे, ज्ञानेश्‍वर गावंडे, गोपाळराव काठोळे, बाळासाहेब वसू, शेख गणी, शरद देशमुख यांच्यासह कौलखेड, विराहित, म्हैसांग, रामगाव, अन्वी मिर्झापूर, पळसो, सुकळी, सांगळूद, डोंगरगाव मासा, बोरगाव मंजू, आपातापा येथील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.