शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

धानोरा येथील शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:32 IST

पारस : येथून जवळच असलेल्या धानोरा शेतशिवारात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत ...

पारस : येथून जवळच असलेल्या धानोरा शेतशिवारात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत होती. या आनुषंगाने नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठ्यांना दिला होता; मात्र धानोरा शेतशिवारात तलाठ्याने सर्व्हे न केल्यामुळे शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी ९ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात धडक देत तहसीलदाराना निवेदन देऊन तलाठ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांनी तहसीलदाराना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, धानोरा शेतशिवारात नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे न झाल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. याबाबत कृषी सहायकाशी संपर्क केला असता तलाठी माझ्यासोबत पीक नुकसानाच्या सर्व्हेसाठी आलेच नसल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. तलाठ्याच्या हलगर्जीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहिले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनातून केला आहे. वरिष्ठांनी चौकशी करून तलाठ्यावर कारवाई करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना धानोरा शेतशिवारातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो)