शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शेतकरी, कामगारविरोधी कायदे रद्द करण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन बाेलवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:18 IST

अकाेला : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार कायद्याविराेधात असंताेष आहे दिल्लीतही आंदाेलन सुरू आहे अशा ...

अकाेला : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी व कामगार कायद्याविराेधात असंताेष आहे दिल्लीतही आंदाेलन सुरू आहे अशा स्थितीत राज्य सरकारने विशेष अधिवेशन बाेलावून या कायद्यांचा विधीमंडळात विराेध करावा, असे स्पष्ट करत राष्ट्रीय मजदूर काँग्रेस अर्थात इंटक मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याची माहिती इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सोमवारी दिली

साेमवारी आयोजित पत्रकार परिषदेत छाजेड यांनी महाविकास आघाडीचाही या कायद्यांना विराेध असल्याचे सांगितले राज्य सरकारने हा विराेध कायदेशीर मार्गाने नाेंदविण्यासाठी विधी मंडळाचे विशेष अधिवेशनात हे कायदे राज्यात राबविणार नाही, असा ठराव घेण्याची मागणी त्यांनी केली.

अनेक उद्याेगांमध्ये कामगारांना काढून टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. देशातील राज्यकर्त्यांना साेयीच्या काॅर्पाेरेट घराण्यांसाठीचे असे कायदे केले असून, इंटक याविराेधात माेर्चा काढणार असल्याचे ते म्हणाले राज्यव्यापी माेर्चात राज्यभरातील इंटकसमवेत सर्व कामगार व शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याबाबत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले प्रदेश इंटकच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींचे संमेलनाचेही आयाेजन केले जाणार असून, त्यामध्ये

अ. भा. काँग्रेस कमिटीचे प्रभारी एच. के. पाटील, इंटकचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नितीन राऊत, अमित देशमुख, आशिष दुवा आदींना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी प्रदेश इंटक नेते मुकेश तिगोटे, प्रदीप वखारिया, महेंद्रसिंग सलुजा, शैलेश सूर्यवंशी, काॅ. देवराव पाटील, काॅ.नयन गायकवाड, सुमंत आवळे, अनिल मावळे, एस. पाटकर, अकिशोर संपळे, शिरसोदे, हसन कादरी, सूरज मेश्राम, पिटके, बी. के. मनवर, संजय राऊत, मेहमूद, इस्माईल, विशाल तायडे, नागेश शेंडे, संदीप मोडक आदी उपस्थित होते.