शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अन्नदात्यांसाठी शेतकरी पुत्रांचा अन्नत्याग!

By admin | Updated: March 20, 2017 02:47 IST

शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी, स्वाभिमानासाठी अभिनव आंदोलन.

अकोला, दि. १९- स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनी राज्यभर शेतकरी प्रश्नांवर मंथन करण्यासाठी व शेतकरी समस्यांचे मूळ असलेले शेतकरीविरोधी कायदे व धोरणांचा निषेध करण्यासाठी रविवारी अकोल्यातील गांधी जवाहर बागेसमोर शेतकरी पुत्रांनी एकदिवसीय अन्नत्याग आत्मक्लेश आंदोलन केले. देशभरात झालेल्या लाखो शेतकर्‍यांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेती व शेतकर्‍यांची एकंदर दशा आणि दिशा यावर मंथन करण्यासाठी मोठय़ा संख्येने शेतकरी व शेतकरीपुत्र या अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले. शेतकरी संघटना युवा आघाडी अकोला जिल्हाचे अध्यक्ष अविनाश पाटील नाकट यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हे अन्नत्याग आंदोलन शेतकरीविरोधी कोडग्या व्यवस्थेवर ओढलेला आसूड ठरावा, या निमित्ताने शेती व शेतकर्‍यांची दुरवस्था करणार्‍या धोरणांविरोधात ठिणगी उठावी व शेती व शेतकर्‍यांची स्थिती सुधारण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, हक्काची संपूर्ण कर्जमुक्ती व सर्व शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात येऊन खर्‍या अर्थाने बळीचे राज्य यावे, असे विचार या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केले.अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी मोठय़ा संख्येने शेतकरी पुत्रांनी उपस्थिती लावली. बळीराजाच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा संकल्प या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेतल्या. शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्या व प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे आश्‍वासन डॉ. पाटील यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिले. अन्नत्याग आंदोलनासाठी डॉ. अभय पाटील, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. सीमा तायडे, भाजपाचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, डॉ. गजानन नारे, किशोर बळी, प्रकाश मानकर, भाई रजनीकांत, प्रशांत बुले, मराठा सेवा संघाचे अशोक पटोकार, प्रदीप चवरे, डॉ. विजय जाधव, पंकज जायले, इंदुमती देशमुख, वनिता गावंडे, अविनाश पाटील, प्रदीप गुरुखुद्दे, संतोष खुमकर, युनूस खान, सुरेश राऊत, प्रा. दिवाकर पाटील, प्रा. दिनकर पाटील, सुनील जानोरकर, राजेश वाघोडे, दीपक नकासकार, आकाश दांदळे, चाँद खा व अकोला जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतूनही शेतकर्‍यांची उपस्थिती होती. संचालन धनंजय मिश्रा व आभारप्रदर्शन आकाश दांदळे यांनी केले.अकोट येथेही अन्नत्यागअकोट येथे साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबीयांना कवितेतून श्रद्धांजली देण्यात आली. शेतकरी चर्चासत्र घेण्यात आले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. शेतकरी कर्जमुक्तीच्या घोषणा देण्यात आल्या.