शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

अन्नदात्यांसाठी शेतकरी पुत्रांचा अन्नत्याग!

By admin | Updated: March 20, 2017 02:47 IST

शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी, स्वाभिमानासाठी अभिनव आंदोलन.

अकोला, दि. १९- स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनी राज्यभर शेतकरी प्रश्नांवर मंथन करण्यासाठी व शेतकरी समस्यांचे मूळ असलेले शेतकरीविरोधी कायदे व धोरणांचा निषेध करण्यासाठी रविवारी अकोल्यातील गांधी जवाहर बागेसमोर शेतकरी पुत्रांनी एकदिवसीय अन्नत्याग आत्मक्लेश आंदोलन केले. देशभरात झालेल्या लाखो शेतकर्‍यांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेती व शेतकर्‍यांची एकंदर दशा आणि दिशा यावर मंथन करण्यासाठी मोठय़ा संख्येने शेतकरी व शेतकरीपुत्र या अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले. शेतकरी संघटना युवा आघाडी अकोला जिल्हाचे अध्यक्ष अविनाश पाटील नाकट यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.हे अन्नत्याग आंदोलन शेतकरीविरोधी कोडग्या व्यवस्थेवर ओढलेला आसूड ठरावा, या निमित्ताने शेती व शेतकर्‍यांची दुरवस्था करणार्‍या धोरणांविरोधात ठिणगी उठावी व शेती व शेतकर्‍यांची स्थिती सुधारण्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव, हक्काची संपूर्ण कर्जमुक्ती व सर्व शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात येऊन खर्‍या अर्थाने बळीचे राज्य यावे, असे विचार या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केले.अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी मोठय़ा संख्येने शेतकरी पुत्रांनी उपस्थिती लावली. बळीराजाच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याचा संकल्प या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अन्नत्याग आंदोलनाला भेट देऊन शेतकर्‍यांच्या भावना जाणून घेतल्या. शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्या व प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचे आश्‍वासन डॉ. पाटील यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिले. अन्नत्याग आंदोलनासाठी डॉ. अभय पाटील, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. सीमा तायडे, भाजपाचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, डॉ. नीलेश पाटील, धनंजय मिश्रा, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, डॉ. गजानन नारे, किशोर बळी, प्रकाश मानकर, भाई रजनीकांत, प्रशांत बुले, मराठा सेवा संघाचे अशोक पटोकार, प्रदीप चवरे, डॉ. विजय जाधव, पंकज जायले, इंदुमती देशमुख, वनिता गावंडे, अविनाश पाटील, प्रदीप गुरुखुद्दे, संतोष खुमकर, युनूस खान, सुरेश राऊत, प्रा. दिवाकर पाटील, प्रा. दिनकर पाटील, सुनील जानोरकर, राजेश वाघोडे, दीपक नकासकार, आकाश दांदळे, चाँद खा व अकोला जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांतूनही शेतकर्‍यांची उपस्थिती होती. संचालन धनंजय मिश्रा व आभारप्रदर्शन आकाश दांदळे यांनी केले.अकोट येथेही अन्नत्यागअकोट येथे साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबीयांना कवितेतून श्रद्धांजली देण्यात आली. शेतकरी चर्चासत्र घेण्यात आले. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. शेतकरी कर्जमुक्तीच्या घोषणा देण्यात आल्या.