शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना आता मदतीची आस

By admin | Updated: November 11, 2015 01:56 IST

अकोलाजिल्हय़ातील सर्वच गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती.

अकोला: अत्यल्प पावसामुळे पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याच्या स्थितीत जिल्हय़ातील लागवडीयोग्य सर्वच ९९७ गावांमधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ातील सर्वच गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी, शासनाकडून मदत केव्हा जाहीर केली जाते, याबाबतची आस आता दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना लागली आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकीच्या स्थितीत जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षीदेखील पावसाने दगा दिला असून, अत्यल्प पावसामुळे जिल्हय़ात मूग, उडिदाचे पीक बुडाले. सोयाबीन उत्पादन सरासरी एकरी एक ते दीड क्विंटल झाले. कपाशी पिकाचे उत्पादनही एकरी चार क्विंटलच्या वर होणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे नापिकीच्या स्थितीत जिल्हय़ातील शेतकरी संकटात सापडला आहे. प्रत्यक्ष पीक परिस्थिती आणि उत्पादनाच्या आधारे जिल्हय़ातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी गत शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्हय़ातील खरीप पिकांची सरासरी पैसेवारी ४२ पैसे आहे. खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, जिल्हय़ातील दुष्काळी परिस्थितीचे चित्र स्पष्ट आहे. जिल्हय़ातील सर्वच गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आली आहे; मात्र दुष्काळी गावांना सवलती व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदत शासनामार्फत अद्याप जाहीर करण्यात आली नाही.