शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वन्य प्राण्यांच्या हैदोसात १२ गावांतील शेतकऱ्यांनी सोडून दिला ज्वारीचा पेरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 10:52 IST

Agriculture News : गेल्या ११ वर्षांपासून या पिकांची पेरणी बंद करण्यात आल्याने, संबंधित गावांमध्ये या पिकांचे उत्पादन नामशेष झाले आहे.

- संतोष येलकर

अकोला: वन्य प्राण्यांचा हैदोस वाढल्याने, अकोला तालुक्यातील १२ गावांमध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी, मूग व उडिदाचा पेरा सोडून दिला आहे. गेल्या ११ वर्षांपासून या पिकांची पेरणी बंद करण्यात आल्याने, संबंधित गावांमध्ये या पिकांचे उत्पादन नामशेष झाले आहे. यासोबतच सोयाबीन, तूर आणि कपाशीचे पीक वन्य प्राण्यांच्या हैदोसातून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना जीव धाेक्यात टाकून धडपड करावी लागत आहे.

जिल्हयातील अकोला तालुक्यात म्हैसांग, रामगाव , गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर, पळसो बढे, दहिगाव गावंडे, बहिरखेड, कौलखेड जहाॅगीर, मजलापूर, दापूरा, अंबिकापूर व कट्यार इत्यादी १२ गावांमध्ये ज्वारी, संकरीत ज्वारी, मूग व उडिद या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात येत होते. महत्वाचे पीक म्हणून या पिकांचे उत्पादन घेतले जात होते. परंतू २००९ ....१० पासून या गावांतील शेतांमध्ये हरिण, जंगली डुकर व रोही इत्यादी वन्य प्राण्यांचा हैदोस सुरु झाला. शेतात पेरलेले ज्वारी, मूग व उडिदाचे पीक वन्य प्राण्यांच्या हैदोसात उध्वस्त होत असल्याने गेल्या ११ वर्षांपासून १२ गावांतील शेतकऱ्यांनी या पिकांचा पेरा सोडून दिला. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळात पेरलेले पीक काहीच हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकांची पेरणी बंद केली. त्यामुळे या गावांतील ज्वारी, मूग, उडिदाचे उत्पादन नामशेष झाले आहे. सद्यस्थितीत या गावांमध्ये सोयाबीन, तूर व कपाशी या पिकांचे उत्पादन घेण्यात येत असले तरी, वन्य प्राण्यांच्या हैदोसातून ही पिके वाचविण्यासाठीही शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात टाकून धडपड करावी लागत आहे.

 

पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते धडपड!

शेतात उगवलेले सोयाबीन, कपाशी व तुरीचे पीक वन्य प्राणी फस्त करतात. वन्य प्राण्याच्या हैदोसात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतातील पिके वाचविण्यासाठी जीव धोक्यात टाकून रात्रीच्यावेळी शेतात जाऊन धडपड करावी लागते. वन्य प्राण्यांना पिटाळून लावण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात फटाके फोडणे, वेगवेगळे आवाज काढणे, डबे वाजविणे इत्यादी उपाययोजना शेतकऱ्यांना कराव्या लागत आहेत.

मूग, उडिदाची डाळ विकत घेण्याची वेळ!

वन्य प्राण्यांच्या हैदोसाला कंटाळून १२ गावांमध्ये ११ वर्षांपासून ज्वारी, मूग व उडिदाचा पेरा बंद झाल्याने, या गावांतील जनावरांसाठी कडबा व कुट्टीचा चारा बंद झाला आहे. तसेच मूग व उडिदाची डाळ विकत घेण्याची वेळ या गावांतील शेतकऱ्यांवर आली आहे.

 

वन्य प्राण्यांच्या वाढत्या हैदोसाला कंटाळून १२ गावांत गेल्या ११ वर्षांपासून ज्वारी, मूग व उडीद या पिकांची पेरणी करणे शेतकऱ्यांनी सोडून दिले आहे. त्यामुळे या भागातील संबंधित पिकांचे उत्पादन नामशेष झाले आहे. सोयाबीन, कपाशी व तूर या पिकांची पेरणी केली जाते. मात्र, वन्य प्राण्यांच्या हैदोसातून ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात टाकून धडपड करावी लागते.

- शिवाजीराव भरणे, शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :agricultureशेतीAkolaअकोला