शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: November 11, 2015 02:04 IST

२५ हजार ८0१ शेतक-यांनी काढला होता विमा

सायखेड (अकोला): गतवर्षी रब्बी हंगामातील पिकांसाठी काढलेल्या विम्याचा लाभ जिल्ह्यातील २५ हजार ८0१ शेतकर्‍यांना मिळालेला नाही. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांना फटका बसला. परिणामी उत्पादन घटले. त्यामुळे रब्बी पिकांसाठी पैसा कोठून आणावा आणि संसाराचा गाडा कसा हाकावा, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. विम्याचा लाभ मिळाला असता तर थोडीशी का होईना विवंचना कमी झाली असती, अशी भावना शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. गतवर्षी दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकर्‍यांना शासनाच्या आर्थिक मदतीसह खरीप हंगामासाठी काढलेला पीक विमा मिळाला होता. शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठी शेती तयार करून मागील दुष्काळाची झीज भरून काढण्यासाठी पेरणी केली; मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा रब्बी पिकांना फटका बसला. पिके काढणीला घेताच वादळी वार्‍यासह गारपीट व अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा व इतर पिके भुईसपाट झाली. गतवर्षी रब्बी हंगामात अकोला, आकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी, मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील २५ हजार ८0१ शेतकर्‍यांनी रब्बी पीक विमा काढून पिकाला संरक्षण दिले होते. यंदा जून महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात दमदार पाऊस झाला; मात्र नंतर २५ पेक्षा जास्त दिवस पावसाने दडी मारल्याने पिके सुकली. त्यानंतर काही ठिकाणी अतवृष्टीही झाली. त्यामुळे उत्पादन प्रचंड घटले. बहुतांश शेतकर्‍यांचा तर मशागत आणि पेरणीचा खर्चही निघालेला नाही; मात्र आता गतवर्षीचा रब्बी पीक विमा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. शासनाने तातडीने विमा मंजूर होण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांमधून होत आहे.