शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

दिल्लीतील आंदाेलनाबाबत चुकीच्या अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:45 IST

अकोला.. संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदाेलनाला बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात आहे. आंदोलकांबद्दल चुकीच्या अफवा काही लोक ...

अकोला.. संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदाेलनाला बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात आहे. आंदोलकांबद्दल चुकीच्या अफवा काही लोक पसरवून आंदोलनाला गालबोट लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा प्रयत्नांमधून हे आंदाेलन थांबणार नाही. तीन काळे कायदे रद्द होईपर्यंत काहीही झाले तरी शेतकरी शांत बसणार नाहीत याची जाणीव या आंदाेलनात प्रत्यक्ष सहभाग घेतल्यावर तसेच आंदाेलकांशी चर्चा केल्यावर झाली आहे, अशी माहिती किसान विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी ५ जानेवारीला अकोल्यातून निघालेल्या किसान विकास मंचच्या २०० सदस्यांचे १२ जानेवारी रोजी अकोल्यात आगमन झाले, यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते.

३ दिवस दिल्ली आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देताना जे अनुभव आम्हाला आलेत ते आयुष्यभर लढण्याची ऊर्जा देत राहतील. किसान विकास मंचचे सदस्य अकोल्यातून निघाल्यावर दि. ७ जानेवारी रोजी सर्वप्रथम ग्वालियर व नंतर दि. ८ जानेवारी रोजी किसान विकास मंच हरियाणा व दिल्ली जवळील पलवल बॉर्डर येथे शेतकरी-महिलांसह पोहोचले, देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे रद्द झालेच पहिजेत, याकरिता पलवल बॉर्डरवर निदर्शने केली. या पलवल सीमेवर शेतकरी आंदोलनाचे नियोजन करणारे जीत सिंग, जगन चौधरी, बलराजसिंग, महेंद्र सिंग चौहान यांची भेट घेऊन आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा झाली. दिल्लीतील आंदोलकांबद्दल चुकीच्या अफवा काही लोक पसरवून आंदोलनाला गालबोट लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी जाणीव करून दिली व तीन काळे कायदे रद्द होईपर्यंत काहीही झाले तरी शांत बसणार नाही, असे सर्वानुमते ठरल्याचे सांगितले. ८ जानेवारी रोजी दिल्लीतील सिंधू बॉर्डरवरील मुख्य शेतकरी आंदोलनात अकोल्यातील २०० शेतकऱ्यांसह किसान विकास मंचाने आंदोलनात सहभाग घेऊन आंदोलनांला पाठिबा दर्शविला. यावेळी जथेदर राजा राजसिंग व अर्बन खरबन यांच्या भेटीत माहिती मिळाली की, शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य न केल्यास २६ जानेवारीला या देशातील किसान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील, असेही स्पष्ट करण्यात आले. केंद्र सरकारने तिन्ही काळे कायदे रद्द केले नाहीत तर देशातील अन्य शेतकऱ्यांसह दिल्लीत तिरंगा फडकविण्यासाठी किसान विकास मंच २६ जानेवारी रोजी पुन्हा दिल्लीत जाईल, अशी माहिती दिल्ली आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन आलेले किसान विकास मंचाचे संयोजक भय्यासाहेब ऊर्फ अविनाश देशमुख, संयोजक विवेक पारस्कर यांनी दिली. यावेळी राजू पाटील, आलमगीर खान, अमोल नळकाडे, सॊ. मनीषा महल्ले, सो. सुनीता धुरंधर, सौ. बबिता लुले, सौ. गीता अहिरे, सौ. स्वाती बोर्डे, सौ. किरण गावंडे, सौ. शारदा घरत, सौ. अर्चना कांबळे आदी उपस्थित होते.