शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील आंदाेलनाबाबत चुकीच्या अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:45 IST

अकोला.. संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदाेलनाला बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात आहे. आंदोलकांबद्दल चुकीच्या अफवा काही लोक ...

अकोला.. संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदाेलनाला बदनाम करण्याचे कारस्थान रचले जात आहे. आंदोलकांबद्दल चुकीच्या अफवा काही लोक पसरवून आंदोलनाला गालबोट लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा प्रयत्नांमधून हे आंदाेलन थांबणार नाही. तीन काळे कायदे रद्द होईपर्यंत काहीही झाले तरी शेतकरी शांत बसणार नाहीत याची जाणीव या आंदाेलनात प्रत्यक्ष सहभाग घेतल्यावर तसेच आंदाेलकांशी चर्चा केल्यावर झाली आहे, अशी माहिती किसान विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

आंदोलनांला पाठिंबा देण्यासाठी ५ जानेवारीला अकोल्यातून निघालेल्या किसान विकास मंचच्या २०० सदस्यांचे १२ जानेवारी रोजी अकोल्यात आगमन झाले, यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते.

३ दिवस दिल्ली आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देताना जे अनुभव आम्हाला आलेत ते आयुष्यभर लढण्याची ऊर्जा देत राहतील. किसान विकास मंचचे सदस्य अकोल्यातून निघाल्यावर दि. ७ जानेवारी रोजी सर्वप्रथम ग्वालियर व नंतर दि. ८ जानेवारी रोजी किसान विकास मंच हरियाणा व दिल्ली जवळील पलवल बॉर्डर येथे शेतकरी-महिलांसह पोहोचले, देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून केंद्र सरकारने केलेले तीन काळे कायदे रद्द झालेच पहिजेत, याकरिता पलवल बॉर्डरवर निदर्शने केली. या पलवल सीमेवर शेतकरी आंदोलनाचे नियोजन करणारे जीत सिंग, जगन चौधरी, बलराजसिंग, महेंद्र सिंग चौहान यांची भेट घेऊन आंदोलनाच्या पुढील रणनीतीवर चर्चा झाली. दिल्लीतील आंदोलकांबद्दल चुकीच्या अफवा काही लोक पसरवून आंदोलनाला गालबोट लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याची त्यांनी जाणीव करून दिली व तीन काळे कायदे रद्द होईपर्यंत काहीही झाले तरी शांत बसणार नाही, असे सर्वानुमते ठरल्याचे सांगितले. ८ जानेवारी रोजी दिल्लीतील सिंधू बॉर्डरवरील मुख्य शेतकरी आंदोलनात अकोल्यातील २०० शेतकऱ्यांसह किसान विकास मंचाने आंदोलनात सहभाग घेऊन आंदोलनांला पाठिबा दर्शविला. यावेळी जथेदर राजा राजसिंग व अर्बन खरबन यांच्या भेटीत माहिती मिळाली की, शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य न केल्यास २६ जानेवारीला या देशातील किसान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील, असेही स्पष्ट करण्यात आले. केंद्र सरकारने तिन्ही काळे कायदे रद्द केले नाहीत तर देशातील अन्य शेतकऱ्यांसह दिल्लीत तिरंगा फडकविण्यासाठी किसान विकास मंच २६ जानेवारी रोजी पुन्हा दिल्लीत जाईल, अशी माहिती दिल्ली आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन आलेले किसान विकास मंचाचे संयोजक भय्यासाहेब ऊर्फ अविनाश देशमुख, संयोजक विवेक पारस्कर यांनी दिली. यावेळी राजू पाटील, आलमगीर खान, अमोल नळकाडे, सॊ. मनीषा महल्ले, सो. सुनीता धुरंधर, सौ. बबिता लुले, सौ. गीता अहिरे, सौ. स्वाती बोर्डे, सौ. किरण गावंडे, सौ. शारदा घरत, सौ. अर्चना कांबळे आदी उपस्थित होते.