शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

मुदतवाढ दिली; पण महाविद्यालयीन प्रवेशासाठी जागाच शिल्लक नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:16 IST

अकोला : यंदा पदवी अभ्यासक्रमाचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जवळपास ...

अकोला : यंदा पदवी अभ्यासक्रमाचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जवळपास सर्वच जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश न मिळाल्याने अमरावती विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जागाच शिल्लक नसल्याने प्रवेश मिळणार कसा, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात काही परीक्षा ऑनलाईन, तर काही परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर पार पडल्या. या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी पास झाले. गत वर्षीपर्यंत हा निकाल ७० ते ७५ टक्क्यांवर होता. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळायचा. परंतु, यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश दिलेल्या मुदतीतच पूर्ण झाले. अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने अमरावती विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. महाविद्यालयांकडे प्रवेश देण्यासाठी जागाच शिल्लक नसताना दिलेल्या मुदतवाढीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक विद्यार्थ्यांचा निकाल ‘विथ हेल्ड’मध्ये

अनेक विद्यार्थ्यांचा निकाल ‘विथ हेल्ड’मध्ये असल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांनाही निकालाची प्रतीक्षा आहे. यातील जे विद्यार्थी उत्तीर्ण हाेतील, त्यांना प्रवेशासाठी जागाच उपलब्ध नसतील. त्यामुळे महाविद्यालयांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

महाविद्यालयस्तरावर १० टक्के जागांमध्ये वाढ

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागाच शिल्लक नसल्याने महाविद्यालय स्तरावर १० टक्के जागा वाढविण्यात आल्याची माहिती महाविद्यालयांनी दिली, परंतु, या जागादेखील मर्यादीत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाविनाच राहावे लागण्याची शक्यता आहे.

यंदा निकाल जास्त लागल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जागांची अडचण निर्माण झाली आहे. प्रामुख्याने विज्ञान शाखेत मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्रीसाठी यांसारख्या विषयांना विद्यार्थ्यांची जास्त पसंती असून, त्यांना प्रवेेश मिळणे कठीण झाले आहे.

- डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, अकोला