शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मुदतवाढ दिली; पण महाविद्यालयीन प्रवेशासाठी जागाच शिल्लक नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:16 IST

अकोला : यंदा पदवी अभ्यासक्रमाचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जवळपास ...

अकोला : यंदा पदवी अभ्यासक्रमाचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जवळपास सर्वच जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. अद्यापही अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश न मिळाल्याने अमरावती विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी जागाच शिल्लक नसल्याने प्रवेश मिळणार कसा, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात काही परीक्षा ऑनलाईन, तर काही परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर पार पडल्या. या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी पास झाले. गत वर्षीपर्यंत हा निकाल ७० ते ७५ टक्क्यांवर होता. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळायचा. परंतु, यंदा उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश दिलेल्या मुदतीतच पूर्ण झाले. अद्याप अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याने अमरावती विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. महाविद्यालयांकडे प्रवेश देण्यासाठी जागाच शिल्लक नसताना दिलेल्या मुदतवाढीत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनेक विद्यार्थ्यांचा निकाल ‘विथ हेल्ड’मध्ये

अनेक विद्यार्थ्यांचा निकाल ‘विथ हेल्ड’मध्ये असल्याची माहिती आहे. या विद्यार्थ्यांनाही निकालाची प्रतीक्षा आहे. यातील जे विद्यार्थी उत्तीर्ण हाेतील, त्यांना प्रवेशासाठी जागाच उपलब्ध नसतील. त्यामुळे महाविद्यालयांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

महाविद्यालयस्तरावर १० टक्के जागांमध्ये वाढ

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागाच शिल्लक नसल्याने महाविद्यालय स्तरावर १० टक्के जागा वाढविण्यात आल्याची माहिती महाविद्यालयांनी दिली, परंतु, या जागादेखील मर्यादीत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाविनाच राहावे लागण्याची शक्यता आहे.

यंदा निकाल जास्त लागल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जागांची अडचण निर्माण झाली आहे. प्रामुख्याने विज्ञान शाखेत मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्रीसाठी यांसारख्या विषयांना विद्यार्थ्यांची जास्त पसंती असून, त्यांना प्रवेेश मिळणे कठीण झाले आहे.

- डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, अकोला