शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

मुदत संपली; पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा!

By admin | Updated: July 5, 2017 00:51 IST

जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ कामे पूर्ण

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असून, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात ३११ गावांमध्ये प्रस्तावित ३११ उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत केवळ ५५ गावांमध्ये ५९ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा उडाला आहे.जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत गत उन्हाळ्यात विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाई निवारणासाठी ३११ गावांमध्ये १९८ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन विंधन विहीर, कूपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा व खासगी विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. २५ कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित १३९ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे अत्यल्प प्रमाण बघता, यावर्षी पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याची स्थिती आहे.पावसाळ्यातही अनेक गावांत पाणीटंचाई!पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यात धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह अनेक गावांमध्ये पावसाळ्यातही पाणीटंचाईची परिस्थिती कायम असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.आराखडा २५ कोटींचा; कामे ३८ लाखांची!जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी २५ कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या १९८ उपाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर करण्यात आला; मात्र अपेक्षित खर्चाच्या तुलनेत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या ५९ उपाययोजनांच्या कामांवर केवळ ३८ लाख ४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.