शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

मुदत संपली; पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा!

By admin | Updated: July 5, 2017 00:51 IST

जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ कामे पूर्ण

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असून, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात ३११ गावांमध्ये प्रस्तावित ३११ उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत केवळ ५५ गावांमध्ये ५९ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा उडाला आहे.जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत गत उन्हाळ्यात विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाई निवारणासाठी ३११ गावांमध्ये १९८ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन विंधन विहीर, कूपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा व खासगी विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. २५ कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित १३९ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे अत्यल्प प्रमाण बघता, यावर्षी पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याची स्थिती आहे.पावसाळ्यातही अनेक गावांत पाणीटंचाई!पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यात धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह अनेक गावांमध्ये पावसाळ्यातही पाणीटंचाईची परिस्थिती कायम असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.आराखडा २५ कोटींचा; कामे ३८ लाखांची!जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी २५ कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या १९८ उपाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर करण्यात आला; मात्र अपेक्षित खर्चाच्या तुलनेत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या ५९ उपाययोजनांच्या कामांवर केवळ ३८ लाख ४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.