शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपली; पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा!

By admin | Updated: July 5, 2017 00:51 IST

जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ कामे पूर्ण

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असून, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यात ३११ गावांमध्ये प्रस्तावित ३११ उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत केवळ ५५ गावांमध्ये ५९ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा बोजवारा उडाला आहे.जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत गत उन्हाळ्यात विविध गावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाई निवारणासाठी ३११ गावांमध्ये १९८ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन विंधन विहीर, कूपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा व खासगी विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. २५ कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ ५५ गावांमध्ये ५९ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली. उर्वरित १३९ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी जून अखेरपर्यंत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या कामांचे अत्यल्प प्रमाण बघता, यावर्षी पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांचा जिल्ह्यात बोजवारा उडाल्याची स्थिती आहे.पावसाळ्यातही अनेक गावांत पाणीटंचाई!पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यात धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यासह अनेक गावांमध्ये पावसाळ्यातही पाणीटंचाईची परिस्थिती कायम असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.आराखडा २५ कोटींचा; कामे ३८ लाखांची!जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी २५ कोटी ६८ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित असलेल्या १९८ उपाययोजनांच्या कामांचा आराखडा मंजूर करण्यात आला; मात्र अपेक्षित खर्चाच्या तुलनेत जिल्ह्यात पूर्ण करण्यात आलेल्या ५९ उपाययोजनांच्या कामांवर केवळ ३८ लाख ४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.