शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

चोंढी धरण क्षेत्रात अतिवृष्टी; पुरात २५ गुरे गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:21 IST

पातूर : तालुक्यातील चोंढी धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परिसरातील साखरखळी, राजगुरी व ...

पातूर : तालुक्यातील चोंढी धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परिसरातील साखरखळी, राजगुरी व चारमोडी गावातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने या पुरात २० ते २५ गुरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी वाढल्याने चोंढी, आंधारसांगवी, चारमोळी गावाचा संपर्क तुटला होता. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यात गत दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. शनिवारी चोंढी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने परिसरातील नद्यांना पूर आला होता. मुंगळा गावाकडून येणारी साखर खडी नदी आणि काळाकामठाकडून येणारी राजगुरी नदी यांचा संगम अंधारसांगवी गावानजीक होतो. पुराचा स्तर वाढल्याने शेतशिवारात पाणी शिरले आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतातून गुरे घरी येत असताना आंधारसांगवीनजीक असलेल्या पुलावरून काही गुरे पुरात वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच काही गुरे नदीकाठावरून परत आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. चोंढी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्या दुथडी भरून वाहत होत्या. परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

--------------------

पावसाळ्यात नेहमीच्या परिसरात नद्यांना पूर येतो. नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटतो. मात्र, सध्यातरी कोणतीही गंभीर बाब नसल्याची माहिती आहे. तलाठ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. उद्या पाहणी केल्यानंतर नुकसान समजणार.

- दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.

-----------------------

खानापूर येथे गावात शिरले पाणी

गावच्या दक्षिणेकडून येणारा बोमटधरा आणि लिंगधरा नाल्याला पूर आल्याने तालुक्यातील खानापूर गावात नदीचे पाणी शिरल्याची माहिती आहे. गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस सुरू होताच गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

------------------------

१०० एकरांवरील पिकांचे नुकसान

चोंढी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने चोंढी, आंधारसांगवी, चारमोळी शिवारातील तब्बल १०० एकरांवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

-----------------

निर्गुणा नदीला मोठा पूर

खेट्री : निर्गुणा नदीला मोठा पूर आल्याने चोंढी, आलेगाव, चरणगाव, वीवरा, आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने कपाशी, सोयाबीन, आदी पिके जमीनदोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकाला कोंब फुटले आहे. नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षण करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

---------------

वाडेगाव येथेही सतर्कतेचा इशारा

परिसरात गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. तसेच पातूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने वाडेगाव येथील नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीच्या सुमारास गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.