शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चोंढी धरण क्षेत्रात अतिवृष्टी; पुरात २५ गुरे गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:21 IST

पातूर : तालुक्यातील चोंढी धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परिसरातील साखरखळी, राजगुरी व ...

पातूर : तालुक्यातील चोंढी धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परिसरातील साखरखळी, राजगुरी व चारमोडी गावातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने या पुरात २० ते २५ गुरे वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी वाढल्याने चोंढी, आंधारसांगवी, चारमोळी गावाचा संपर्क तुटला होता. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तालुक्यात गत दोन दिवसांपासून पाऊस सुरू असून, नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. शनिवारी चोंढी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने परिसरातील नद्यांना पूर आला होता. मुंगळा गावाकडून येणारी साखर खडी नदी आणि काळाकामठाकडून येणारी राजगुरी नदी यांचा संगम अंधारसांगवी गावानजीक होतो. पुराचा स्तर वाढल्याने शेतशिवारात पाणी शिरले आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतातून गुरे घरी येत असताना आंधारसांगवीनजीक असलेल्या पुलावरून काही गुरे पुरात वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच काही गुरे नदीकाठावरून परत आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. चोंढी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्या दुथडी भरून वाहत होत्या. परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

--------------------

पावसाळ्यात नेहमीच्या परिसरात नद्यांना पूर येतो. नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटतो. मात्र, सध्यातरी कोणतीही गंभीर बाब नसल्याची माहिती आहे. तलाठ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. उद्या पाहणी केल्यानंतर नुकसान समजणार.

- दीपक बाजड, तहसीलदार, पातूर.

-----------------------

खानापूर येथे गावात शिरले पाणी

गावच्या दक्षिणेकडून येणारा बोमटधरा आणि लिंगधरा नाल्याला पूर आल्याने तालुक्यातील खानापूर गावात नदीचे पाणी शिरल्याची माहिती आहे. गावात पाणी शिरल्याने ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस सुरू होताच गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

------------------------

१०० एकरांवरील पिकांचे नुकसान

चोंढी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने चोंढी, आंधारसांगवी, चारमोळी शिवारातील तब्बल १०० एकरांवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

-----------------

निर्गुणा नदीला मोठा पूर

खेट्री : निर्गुणा नदीला मोठा पूर आल्याने चोंढी, आलेगाव, चरणगाव, वीवरा, आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने कपाशी, सोयाबीन, आदी पिके जमीनदोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने सोयाबीन पिकाला कोंब फुटले आहे. नुकसानग्रस्त भागात सर्वेक्षण करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

---------------

वाडेगाव येथेही सतर्कतेचा इशारा

परिसरात गत दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. तसेच पातूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने वाडेगाव येथील नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीच्या सुमारास गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.