शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा शुल्क माफीचा लाभ १४ हजारपेक्षा जास्त गावातील विद्यार्थ्यांना!

By admin | Updated: November 28, 2015 02:31 IST

१४ हजार ७0८ दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांंचे परिक्षा शुल्क माफ होणार.

कारंजा (वाशिम): यंदा ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांंचे परिक्षा शुल्क माफ होणार असून, यासंदर्भातील निर्णय २४ नोव्हेंबर रोजीच घेण्यात आला. खरीप व रब्बी हंगामात ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना जाहीर करण्यात येतात. त्यानुसार २0१५-१६ च्या खरीप हंगामात पिकांची हंगामी पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आलेल्या १४ हजार ७0८ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून या गावांमध्ये जमीन महसुलात सूट, कृषीपंपाच्या चालू वीज देयकांत ३३.५ टक्के सूट, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंना परिक्षा शुल्क माफी, आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर्सचा वापर, शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदि सुविधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने २0 ऑक्टोबर २0१५ रोजी घेतला होता. आता १४ हजार ७0८ गावांतील विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २४ नोव्हेंबर रोजी घेतला आहे. विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफीसंबंधी तात्काळ कारवाई करून, आवश्यक असल्यास निधीची तरतूद करण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.