शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

परीक्षा शुल्क माफीचा लाभ १४ हजारपेक्षा जास्त गावातील विद्यार्थ्यांना!

By admin | Updated: November 28, 2015 02:31 IST

१४ हजार ७0८ दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांंचे परिक्षा शुल्क माफ होणार.

कारंजा (वाशिम): यंदा ५0 पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ दुष्काळग्रस्त गावांतील विद्यार्थ्यांंचे परिक्षा शुल्क माफ होणार असून, यासंदर्भातील निर्णय २४ नोव्हेंबर रोजीच घेण्यात आला. खरीप व रब्बी हंगामात ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध उपाययोजना जाहीर करण्यात येतात. त्यानुसार २0१५-१६ च्या खरीप हंगामात पिकांची हंगामी पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आलेल्या १४ हजार ७0८ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून या गावांमध्ये जमीन महसुलात सूट, कृषीपंपाच्या चालू वीज देयकांत ३३.५ टक्के सूट, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंना परिक्षा शुल्क माफी, आवश्यक तिथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर्सचा वापर, शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदि सुविधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने २0 ऑक्टोबर २0१५ रोजी घेतला होता. आता १४ हजार ७0८ गावांतील विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २४ नोव्हेंबर रोजी घेतला आहे. विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफीसंबंधी तात्काळ कारवाई करून, आवश्यक असल्यास निधीची तरतूद करण्यासाठी उच्च शिक्षण संचालकांकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.