शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
4
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
5
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
6
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
7
पाकच्या नापाक कारवाया थांबेनात; आयएसआयने हेरगिरी करण्यासाठी निवडला नेपाळचा रस्ता! काय केलं बघाच...
8
सोशल मीडियावर एक पोस्ट आणि गेली २२ लाखांची नोकरी, कंपनीच्या मालकांनी स्वतः सांगितलं कारण
9
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
10
लाखो रुपयांचा IT जॉब सोडून जोडप्याचा शेती करण्याचा निर्णय; आज १ कोटींची उलाढाल; नेमकं काय करतात?
11
Bageshwar Dham: बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी
12
Chaturmas 2025: चतुर्मासात करा 'हा' संकल्प आणि व्यक्तिमत्त्वाला द्या नवीन आकार!
13
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
14
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
15
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
16
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
17
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
18
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
19
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
20
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...

जलपुनर्भरण, वृक्षसंवर्धन राखेल पर्यावरण संतुलन

By admin | Updated: June 5, 2014 21:04 IST

पर्यावरण दिनापासून जल, माती, वृक्ष लागवड व संवर्धनावर प्रत्येकाने भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.

अकोला : पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब मूलस्थानी जिरवावा लागणार असून, वृक्ष लागवड व संवर्धन करावे लागणार आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात होणारा पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या पर्यावरण दिनापासून जल, माती, वृक्ष लागवड व संवर्धनावर प्रत्येकाने भर देण्याची गरज आहे. पर्यावरणाचे म्हणजेच पंचमहाभूताचे संरक्षण होय, यामुळे झाडा-झुडपाचे खर्‍या अर्थाने संरक्षण होते. यासाठी पावसाचे पाणी व वाहून जाणार्‍या मातीच्या व्यवस्थापनासंबंधी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे. आताच्या घडीला भूपृष्ठावर मातीचा भाग आहे. त्यावर एक लाख घन किलोमीटर पाऊस पडतो. यातील ४२ हजार घन किलोमीटर पाणी सरळ समुद्रात वाहून जाते. हे पाणी उताराच्या दिशेने वाहतांना जमीन, शेतीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून नेते, मोठ्या प्रमाणात मातीची धूप होते. यामुळे तलावात गाळ साचतो. नदी, नाले उथळ होतात. पर्यावरण परिस्थितीमध्ये तसेच जमिनीच्या भरावामध्ये मोेठे बदल होतात. परिणामी जंगल, वने, वनस्पती नष्ट होऊ लागतात. मोठ्या प्रमाणात जमीन बोडखी होते. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. यासाठी पडणारा पाऊस शिवारातल्या शिवारात जिरवावा लागतो. त्यामुळे अनेक प्रश्न सोपे होतात. पावसाच्या पाण्याचे यथोचित संवर्धन होते. आजमितीस भुपृष्ठावरील पाणी बघितल्यास हे पाणी नद्यापेक्षा १० पटीने जास्त सरोवर व तलावात आहे. म्हणूनच यापुढे तलाव व सरोवरांचे संवर्धनदेखील करावे लागणार आहे. यासाठी पावसासोबत वाहून येणारा गाळ या तलाव, सरोवरात जाता कामा नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. पर्यावरण संतुलनासाठी पाणी हे मूळ आहे. म्हणजेच पाण्याचेच महत्त्व अधिक आहे.

**साधे उपाय

नदी खोर्‍यात पाणी तर अडवावेच शिवाय प्रत्येकाने यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींनी गावातील पाणी गावातच अडवून जिरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक घराचं पाणी अडवून जिरवावे लागेल. शेतीत उपाययोजना करू न जलसंवर्धन करणे आता काळाची गरज आहे. त्यासाठी शक्य तेवढे उपाय एकत्रितपणे करण्याचा कार्यक्रम आखावा लागणार आहे.

**कारखान्यामुळे प्रदूषण

कारखान्यातून निघणारे वेगवेगळे वायू, धुरामुळे प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणामुळे वातावरणात कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे वृक्षापासून वातावरणात सोडल्या जाणार्‍या प्राणवायुची कार्यक्षमता कमी होते. त्याचे दीर्घ प्रतिकूल परिणाम मानव व प्राण्यांच्या आरोग्यावर होत आहेत.