शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

जलपुनर्भरण, वृक्षसंवर्धन राखेल पर्यावरण संतुलन

By admin | Updated: June 5, 2014 21:04 IST

पर्यावरण दिनापासून जल, माती, वृक्ष लागवड व संवर्धनावर प्रत्येकाने भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.

अकोला : पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब मूलस्थानी जिरवावा लागणार असून, वृक्ष लागवड व संवर्धन करावे लागणार आहे. यामुळे प्रचंड प्रमाणात होणारा पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यास मदत होणार आहे. त्यासाठी या पर्यावरण दिनापासून जल, माती, वृक्ष लागवड व संवर्धनावर प्रत्येकाने भर देण्याची गरज आहे. पर्यावरणाचे म्हणजेच पंचमहाभूताचे संरक्षण होय, यामुळे झाडा-झुडपाचे खर्‍या अर्थाने संरक्षण होते. यासाठी पावसाचे पाणी व वाहून जाणार्‍या मातीच्या व्यवस्थापनासंबंधी प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे. आताच्या घडीला भूपृष्ठावर मातीचा भाग आहे. त्यावर एक लाख घन किलोमीटर पाऊस पडतो. यातील ४२ हजार घन किलोमीटर पाणी सरळ समुद्रात वाहून जाते. हे पाणी उताराच्या दिशेने वाहतांना जमीन, शेतीतील माती मोठ्या प्रमाणात वाहून नेते, मोठ्या प्रमाणात मातीची धूप होते. यामुळे तलावात गाळ साचतो. नदी, नाले उथळ होतात. पर्यावरण परिस्थितीमध्ये तसेच जमिनीच्या भरावामध्ये मोेठे बदल होतात. परिणामी जंगल, वने, वनस्पती नष्ट होऊ लागतात. मोठ्या प्रमाणात जमीन बोडखी होते. यामुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो. यासाठी पडणारा पाऊस शिवारातल्या शिवारात जिरवावा लागतो. त्यामुळे अनेक प्रश्न सोपे होतात. पावसाच्या पाण्याचे यथोचित संवर्धन होते. आजमितीस भुपृष्ठावरील पाणी बघितल्यास हे पाणी नद्यापेक्षा १० पटीने जास्त सरोवर व तलावात आहे. म्हणूनच यापुढे तलाव व सरोवरांचे संवर्धनदेखील करावे लागणार आहे. यासाठी पावसासोबत वाहून येणारा गाळ या तलाव, सरोवरात जाता कामा नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. पर्यावरण संतुलनासाठी पाणी हे मूळ आहे. म्हणजेच पाण्याचेच महत्त्व अधिक आहे.

**साधे उपाय

नदी खोर्‍यात पाणी तर अडवावेच शिवाय प्रत्येकाने यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतींनी गावातील पाणी गावातच अडवून जिरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक घराचं पाणी अडवून जिरवावे लागेल. शेतीत उपाययोजना करू न जलसंवर्धन करणे आता काळाची गरज आहे. त्यासाठी शक्य तेवढे उपाय एकत्रितपणे करण्याचा कार्यक्रम आखावा लागणार आहे.

**कारखान्यामुळे प्रदूषण

कारखान्यातून निघणारे वेगवेगळे वायू, धुरामुळे प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणामुळे वातावरणात कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे वृक्षापासून वातावरणात सोडल्या जाणार्‍या प्राणवायुची कार्यक्षमता कमी होते. त्याचे दीर्घ प्रतिकूल परिणाम मानव व प्राण्यांच्या आरोग्यावर होत आहेत.