शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

अकोल्यातील उद्योजक प्रादेशिक कार्यालयाच्या प्रतीक्षेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 14:02 IST

अकोल्यातील राजकीय शक्ती उद्योजकांच्या या मागणीला खो देते की साथ, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रवीण पोटे यांचे आश्वासन अधांतरीच : वरिष्ठांनी अडविले घोडे

अकोला: स्थानिक महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळचे अमरावती येथील प्रादेशिक कार्यालय अकोल्यात हलविण्यात यावे किंवा तीन जिल्ह्याचे स्वतंत्र कार्यालय थाटले जावे, ही अकोल्यातील उद्योजकांची प्रलंबित मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. मध्यंतरी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी आश्वासन दिले होते; मात्र या आश्वासनाची पूर्तता एका वर्षानंतरही झालेली नाही. अकोल्यातील राजकीय शक्ती उद्योजकांच्या या मागणीला खो देते की साथ, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. औद्योगिक वसाहतीचे प्रादेशिक विभागीय कार्यालय अमरावतीत असल्याने पाचही जिल्ह्यातील उद्योजकांना प्रत्येक परवानगी आणि मागणीसाठी अमरावती गाठावे लागते. वास्तविक पाहता ७० टक्के उद्योग-धंदे अकोला-बुलडाण्यात आहे. सर्वात जास्त महसूल भरणा करणाऱ्यांची संख्याही याच परिसरातील उद्योजकांची आहे. अकोल्यात उद्योग उघडायचे म्हटले की, सर्व सोपस्कार करण्यासाठी अमरावतीच्या वाऱ्या कराव्या लागतात. आरओ अमरावतीत असतात. दर आठवड्यात या अधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यास भेट देणे आणि समस्या सोडविणे अपेक्षित असते; मात्र तसे होत नाही. या सर्व अडचणीवर उपाय म्हणून अकोल्यातील शेकडो उद्योजकांनी अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आणि उद्योग राज्य प्रवीण पोटे यांच्याकडे विभागीय कार्यालय अकोल्यात देण्याची मागणी केली होती. दोन्ही अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. दरम्यान, नागपूर येथील एका बैठकीत अकोला, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यासाठी विभागीय कार्यालय तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली; मात्र पुढे काय झाले कळले नाही. वर्ष पूर्ण होऊनही या कार्याला अजूनही गती मिळालेली नाही. पोटे यांचे आश्वासन हवेतच विरल्याने अकोल्यातील उद्योजकांमध्ये नाराजी आहे. भाजपचे पदाधिकारी आता या मुद्द्यावर उद्योजकांसोबत येतात की यातून मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. - अकोल्यातील उद्योजकांचे प्रश्न कायम रेंगाळत राहतात. दोन-तीन महिन्यात आरओ अकोल्यास येतात. धावती भेट देऊन निघून जातात. अकोला, अकोट आणि खामगावात मोठे उद्योग आहे. जर विभागीय कार्यालय अकोल्यात आले तरच अकोल्याचा विकास शक्य आहे. अन्यथा आहे त्याच गतीने विकासाचा दर कायम राहील. - कैलास खंडेलवाल, अध्यक्ष, इंडस्ट्रिज असो. अकोला.