शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

हंगाम संपण्याच्या मार्गावर; नाफेडचे खरेदी केंद्र उघडले नाहीत

By admin | Updated: November 10, 2014 01:43 IST

अकोला जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांची व्यापा-यांकडे धाव.

विवेक चांदूरकर/अकोला

       मूग, उडीद व सोयाबीन विक्रीचा हंगाम संपत आला असला तरी अद्याप शासनाच्यावतीने शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. आधीच अल्प हमीभाव जाहीर करून दुष्काळाच्या काळात शेतकर्‍यांची खिल्ली उडविण्यात आली असून, खरेदी केंद्र बंद ठेवून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात येत आहे. यावर्षी निसर्गाने शेतकर्‍यांना दगा दिला. अनियमित व अल्प पाऊस झाल्यामुळे पिकांची प्रचंड हानी झाली. उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही घट आली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच शासनाने यावर्षी अल्प हमीभाव जाहीर केले. त्यामुळे बाजारपेठेतही पिकांना कमी भाव मिळत आहेत. अनेकदा हमीभावावर बाजारपेठेतील भाव अवलंबून राहतात. यावर्षी कापसाला २७५0 रुपये हमीभाव देण्यात आला आहे तर सोयाबीन २५६0 रुपये, सूर्यफूल ३७५0, ज्वारी १५३0, मका १३१0, मूग ४६00, उडीद ४३५0, तूर ४३५0 रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. नाफेडच्यावतीने खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्यामुळे शेतकरी व्यापार्‍यांकडे जात आहेत. सोयाबीनची विक्री ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात येते. सध्या नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा आला तरी हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला २७00 ते ३२00 रुपये भाव मिळत आहे. मात्र, बाजारपेठेत हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्यामुळे खरेदी केंद्र सुरू न करण्याचा नाफेडचा निर्णय कितपत योग्य आहे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.