आशिष गावंडे /अकोला: अतिक्रमणाच्या समस्येला अक ोलेकर प्रचंड वैतागले आहेत. रस्त्यालगतचे अतिक्रमण व विस्कळीत वाहतुकीमुळे नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन रस्त्याने वाहने न्यावी लागतात. जागा दिसेल त्या ठिकाणी बिनधास्तपणे उघड्यावर ह्यबाजारह्ण मांडला जात आहे. यावर उपाय म्हणून मनपा प्रशासनाने जून महिन्यात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली. ही मोहीम सतत सुरू ठेवण्याची अपेक्षा असताना, दीड महिन्यांत मोहीम गुंडाळण्यात आली. प्रशासनाने ज्या मार्गावरील अतिक्रमण हटवले, पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण कायम असल्याचे चित्र प्रकर्षाने समोर आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळात अतिक्रमणाची समस्या पुन्हा डोके वर काढत आहे. जनता भाजी बाजार, जुना भाजी बाजार, कापड बाजार, बस स्थानक, लक्झरी बस स्थानक, धार्मिक प्रार्थनास्थळांसह खेळाच्या मैदानांनासुद्धा अतिक्रमणाचा विळखा आहे. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात फोफावलेल्या अतिक्रमणाचा अकोलेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, यामध्ये प्रामुख्याने मुख्य बाजारपेठेत ठाण मांडलेल्या अतिक्रमकांचा समावेश आहे. शॉपिंग कॉम्पलेक्स, औषधी दुकाने, किराणा दुकानांसमोरच हातगाडी, फेरीवाले, चहा विक्रेता, पानटपरी चालक, पाणीपुरी विक्रेत्यांसह खाद्यपेय विक्रेत्यांनी बाजार मांडल्याचे चित्र दिसून येते. अकोलेकरांना सर्वाधिक त्रास गांधी रोड, जुना भाजी बाजार, मोहम्मद अली मार्ग,टिळक रोड, दाना बाजार, किराणा बाजार, खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, काला चबुतरा परिसरात सहन करावा लागतो. अतिक्रमणाची समस्या कमी म्हणून की काय, रस्त्यात कोठेही वाहन उभे करणार्या ऑटोरिक्षाचालकांच्या मनमानीमुळे वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे.
अकोला शहरात अतिक्रमण ‘जैसे थे’!
By admin | Updated: December 26, 2014 00:34 IST