शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
4
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
5
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
6
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
7
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
8
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
9
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
10
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
11
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!
12
१ जुलैपासून 'या' वाहनांना राजधानीत पेट्रोल, डिझेल, CNG मिळणे बंद; सरकारचा मोठा निर्णय
13
१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?
14
अंतराळाच्या दिशेने रवाना झालेल्या शुभांशू शुक्ला यांनी पाठवला पहिला संदेश, म्हणाले, माझ्या देशवासियांनो...  
15
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
16
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
17
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
18
"सरकार येतील जातील पण...", हिंदी भाषा सक्तीवरुन सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
20
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा

वाशिम जिल्ह्यातील चारही वीज अटकाव यंत्रांना ‘उतरती कळा’!

By admin | Updated: July 12, 2016 00:35 IST

प्रशासकीय उदासीनता ; वीज पडून तीन वर्षांत १0 जणांचा मृत्यू.

सुनील काकडे / वाशिमआकाशातून जमिनीकडे आकर्षित होणार्‍या विजेने गत तीन वर्षांंत जिल्ह्यातील तब्बल १0 लोकांचा बळी घेतला. याशिवाय शेकडो जनावरेही यामुळे जिवाला मुकली आहेत. असे असताना जिल्ह्यात आजपर्यंत केवळ ४ ठिकाणी वीज अटकाव यंत्र उभी झाली असून, त्यांचीही आजरोजी दुरवस्था झालेली आहे.साधारणत: मे महिन्याच्या अखेरीस, जून महिन्याच्या प्रारंभी आणि ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडण्याचे प्रमाण अधिक असते. या कालावधीतच विजांचा कडकडाट होऊन प्राणहानी होण्याची शक्यता उद्भवते. वाशिम जिल्ह्यात सन २0१३-१४ मध्ये एका इसमाचा वीज पडून मृत्यू झाला, २0१४-१५ मध्ये ७ जण गंभीररीत्या जखमी झाले, २0१५-१६ मध्ये वीज पडून ७ जणांना प्राणाला मुकावे लागले; तर एप्रिल २0१६ पासून आजपर्यंंत दोघांचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला. दरम्यान, आकाशातून चकाकत येणारी वीज नेमकी कुठे पडेल, हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी ठिकठिकाणी वीज अटकाव यंत्र (लायटिंग र्ओस्टर) उभारणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. वाशिम जिल्ह्यात आजमितीस केवळ चार वीज अटकाव यंत्र असून, ती वाशिम नगर परिषद, वाराजहाँगीर (ता. वाशिम), भुलोडा (ता. कारंजा) आणि डव्हा (ता. मालेगाव) याठिकाणी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांंपासून या यंत्रांच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष पुरविले गेले नसल्याने त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून अस्तित्वातील वीज अटकाव यंत्रांची दुरुस्ती करून नव्याने आणखी यंत्र बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.विजेपासून करा स्वत:चे रक्षण!वीज पडून सन २0१३ पासून आजपर्यंंत १0 जणांना जीव गमवावा लागला. तथापि, विजांचा कडकडाट सुरू असताना प्रामुख्याने मोबाइलचा वापर टाळणे आवश्यक आहे. पाण्यात असाल तर तत्काळ बाहेर यावे, झाडाखाली उभे राहू नये, अशावेळी विद्युत उपकरणे बंद ठेवणेच अधिक फायदेशीर असून, एकाचवेळी जास्त व्यक्ती एकत्र उभे न राहता दोन व्यक्तींमध्ये किमान १५ फूट अंतर ठेवावे, आदी उपाय प्रामुख्याने केल्यास विजेपासून स्वत:चे रक्षण करणे शक्य होईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बाळासाहेब बोराडे यांनी दिली.