शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील चारही वीज अटकाव यंत्रांना ‘उतरती कळा’!

By admin | Updated: July 12, 2016 00:35 IST

प्रशासकीय उदासीनता ; वीज पडून तीन वर्षांत १0 जणांचा मृत्यू.

सुनील काकडे / वाशिमआकाशातून जमिनीकडे आकर्षित होणार्‍या विजेने गत तीन वर्षांंत जिल्ह्यातील तब्बल १0 लोकांचा बळी घेतला. याशिवाय शेकडो जनावरेही यामुळे जिवाला मुकली आहेत. असे असताना जिल्ह्यात आजपर्यंत केवळ ४ ठिकाणी वीज अटकाव यंत्र उभी झाली असून, त्यांचीही आजरोजी दुरवस्था झालेली आहे.साधारणत: मे महिन्याच्या अखेरीस, जून महिन्याच्या प्रारंभी आणि ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडण्याचे प्रमाण अधिक असते. या कालावधीतच विजांचा कडकडाट होऊन प्राणहानी होण्याची शक्यता उद्भवते. वाशिम जिल्ह्यात सन २0१३-१४ मध्ये एका इसमाचा वीज पडून मृत्यू झाला, २0१४-१५ मध्ये ७ जण गंभीररीत्या जखमी झाले, २0१५-१६ मध्ये वीज पडून ७ जणांना प्राणाला मुकावे लागले; तर एप्रिल २0१६ पासून आजपर्यंंत दोघांचा या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला. दरम्यान, आकाशातून चकाकत येणारी वीज नेमकी कुठे पडेल, हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी ठिकठिकाणी वीज अटकाव यंत्र (लायटिंग र्ओस्टर) उभारणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. वाशिम जिल्ह्यात आजमितीस केवळ चार वीज अटकाव यंत्र असून, ती वाशिम नगर परिषद, वाराजहाँगीर (ता. वाशिम), भुलोडा (ता. कारंजा) आणि डव्हा (ता. मालेगाव) याठिकाणी आहेत. मात्र, गेल्या अनेक वर्षांंपासून या यंत्रांच्या देखभाल, दुरुस्तीकडे लक्ष पुरविले गेले नसल्याने त्यांची आजमितीस पुरती दुरवस्था झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून अस्तित्वातील वीज अटकाव यंत्रांची दुरुस्ती करून नव्याने आणखी यंत्र बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.विजेपासून करा स्वत:चे रक्षण!वीज पडून सन २0१३ पासून आजपर्यंंत १0 जणांना जीव गमवावा लागला. तथापि, विजांचा कडकडाट सुरू असताना प्रामुख्याने मोबाइलचा वापर टाळणे आवश्यक आहे. पाण्यात असाल तर तत्काळ बाहेर यावे, झाडाखाली उभे राहू नये, अशावेळी विद्युत उपकरणे बंद ठेवणेच अधिक फायदेशीर असून, एकाचवेळी जास्त व्यक्ती एकत्र उभे न राहता दोन व्यक्तींमध्ये किमान १५ फूट अंतर ठेवावे, आदी उपाय प्रामुख्याने केल्यास विजेपासून स्वत:चे रक्षण करणे शक्य होईल, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बाळासाहेब बोराडे यांनी दिली.