शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त!

By admin | Updated: June 18, 2017 02:00 IST

वीजपुरवठय़ा अभावी पाणीपुरवठाही ठप्प झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठय़ा अभावी पाणीपुरवठाही ठप्प झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.कुरूम : येथील ऑक्सिजनवर असलेला वीज पुरवठा दहा-दहा मिनिटांनी खंडित होत असल्याने तसेच वादळी वार्‍याने नेहमी रात्रभर बत्ती गूल राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. खंडित वीज पुरवठय़ामुळे पाणीपुरवठाही विस्कळीत होत असून, गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विद्युत वितरण कंपनीच्या माना उपकेंद्रावरून कुरुमसह सात ते आठ गावांना वीज पुरवठा होतो; परंतु तांत्रिक बिघाडाने कुरुम व परिसरातील गावाची नेहमीच दहा-दहा मिनिटांनी बत्ती गूल होते. पावसाळा लागल्याने थोडा जरी वादळी वारा सुटला किंवा पाऊस आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. रात्री बिघाड झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते. कुरुमवासीयांना नेहमीच एक दिवसाआड संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागत आहे. कुरुम येथे मुस्लीम बांधवांची संख्या जास्त असून, सध्या पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू आहेत. वीज पुरवठा खंडित राहत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कुरुम येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून, येथे एक कनिष्ठ अभियंता व सात कर्मचारी कार्यरत आहेत; मात्र कनिष्ठ अभियंतासह एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्रीच्या वेळेस वीज पुरवठय़ात बिघाड होऊन खंडित झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते व दुसर्‍या दिवशी विद्युत कर्मचारी कर्तव्यावर आल्यावर तो बिघाड दुरुस्त झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होतो, तोपर्यंंत विजेशिवाय काम भागवावे लागते. मोठा बिघाड झाल्यास ६ ते ७ तास दुरुस्त करण्यात येत नाही. संपूर्ण कुरुम गाव हे ग्रा.पं.च्या नळ योजनेच्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून असल्यामुळे वीज पुरवठा खंडित राहिला तर कुरुम येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते.  दिनोडा : चोहोट्टा वीज वितरण अंतर्गत येणार्‍या दिनोडा, मरोडा गावात गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पाऊस सुरू होताच लाइन गूल होते. रात्रभर ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विद्युत वितरणचे दुर्लक्ष होत आहे.रेल फिडरवर गेल्या काही दिवसांपासून कधी ना कधी दैनंदिन तांत्रिक बिघाड होत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रात्रभर लाइन बंद पडत असून, ग्रामस्थांना डासांचा सामना करावा लागत आहे. पावसाचे थेंब पडले की लाइन बंद, असा प्रकार गेल्या ८ ते १0 दिवसांपासून सुरू आहे. सदर लाइन केव्हा सुरळीत होणार, याची संबंधित अभियंता यांनी लक्ष देऊन रेल फिडरवरील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. आलेगावात अधिकार्‍यांची दांडीआलेगाव : परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज पुरवठा विस्कळीत असताना वीज वितरणचे उप अभियंत्यांनी मात्र दांडी मारली आहे. खंडित वीज पुरवठय़ामुळे २७ गावांतील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. आलेगाव येथील वीज वितरण कंपनीच्या सब स्टेशनवरून २७ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. या २७ गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यास ग्रामस्थांना रात्रभर अंधारात रहावे लागते. मुख्यालयी अधिकारी आणि कर्मचारी राहत नसल्याने वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. थोडास पाऊस आला, तरी वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी वीज वितरणचे जे कामे करायला हवी होती, ती सुद्धा करण्यात आली नसल्याने वीज पुरवठा नेहमी खंडित होतो. दुर्गम भागातील चोंढी, पिंपरडोळी, चारमोळी, पांढुर्णा या गावांमध्ये, तर दोन-दोन दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. या भागातील ग्रामस्थांना तक्रार करायची असल्यास दोन किमी पायदळ आलेगाव येथे जावे लागते. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.सध्या पावसाचे दिवस आहेत. आलेगाव परिसर मोठा व काही भाग जंगलात असल्याने अनेक वेळा वीज पुरवठा तांत्रिक कारणांनी बंद होतो. हा तांत्रिक दोष दूर करण्यासाठी नेहमी कर्मचारी कार्यरत असतात. तसेच कार्यालयातील हजेरी बुकवर आपण स्वाक्षरी केलेली नाही. - खंडारे, उप अभियंता, वीज उपकेंद्र आलेगाव